Friday, August 29, 2008

'मनसे' चा दणका...

राज ठाकरेंनी काल संध्याकाळी आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा सरकारने सुटल्याचा सुस्कारा सोडला असेन. आणि यापुढे पुन्हा त्रास नको म्हणून लगेच महानगरपालिकेला मराठी पाट्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

राज ठाकरेंचा दरारा खरेच एवढा आहे की जवळपास ८०% व्यापार्‍यांनी मराठी पाट्या तयार करायच्या ऑर्डर्स दिल्या आहेत, हे मी नाही तर पुण्यातले प्रतिष्ठीत दैनिक 'सकाळ' चे शब्द आहेत. या लिंकवर ही बातमी वाचावयास मिळेल. : http://www.esakal.com/esakal/08292008/Specialnews15BDC6FE85.htm
खरे तर हे वाचून खूप बरे वाटले. मी इकडे कर्नाटकात गेली चार वर्षे आहे. फक्त इंग्रजीत पाटी इकडे मी देखील पाहीली नाही....पिझ्झा हट , मॅक्डोनाल्ड्स पण कन्नड भाषेत पहावयास मिळते इकडे. ज्या प्रदेशात कोणतेही दुकान वा कंपनी स्वतःचे ऑफीस थाटते तेथील स्थानिक भाषेत त्या संस्थेने वा कंपनीने स्वतःचे नाव लिहावे असा कायदाच आहे मुळी. कायद्याची अंमलबजावणी सरकार करत नाही म्हणून त्याविरुद्ध आवाज उठविला तर राज ठाकरेंनी काय चूक केली?राज ठाकरे जे बोलतात त्याच्या मुळाशी सत्य असते, अभ्यास असतो हे सरकारला माहीत आहे. स्वतःचे नाकर्तेपण मान्य आहे वा मनात आतून कोठेतरी त्यांचे मराठी मन राज ठाकरेंच्या आवाजाला ओ देते म्हणून की काय राज ठाकरेंविरुद्ध नेहमी चौकशी करु , कायदा सर्वांसाठी सारखा आहे अशी गुळमुळीत उत्तरे प्रेसला देतात. आणि हिंदी भाषिक चॅनेल मात्र अवाच्या सव्वा करुन सांगतात हेही तितकेच खरे आहे. राज ठाकरे प्रत्येक भाषणात जय महाराष्ट्र , जय हिंद असे म्हणतात. ते जय हिंद हे देशासाठी असते हे या चॅनेल्सवाल्यांना ऐकू येत नाही का?

स्थानीक भूमिपुत्रांना योग्य सन्मान द्यावा ही त्यांनी अपेक्षा केली तर काय चूक केली? इकडे बंगळूरात तुमच्या वा हिंदी भाषेत दादागिरी करुन दाखवा बरे? तेवढी हिम्मत या उत्तर भारतीयांमधे नक्कीच नाहिये. सामावून घेणे , आपलेसे करुन घेणे ही मराठी संस्कृती आहे. पण याचा गैरफायदा घेऊन आपल्यालाच घरातून कोणी बाहेर काढू पहात असेल तर संघर्ष हा केलाच पाहिजे. इतिहास साक्ष आहे, दिल्लीच्या चुकांकरिता फक्त मराठी माणूसच धावून आलेला आहे. मग ते स्वतःचे पानिपत करवून घेऊन का असेना, मराठी माणूस दिलेला शब्द पाळतो. अर्थात भाऊबंदकी पण आपल्यात तेवढीच आहे. त्याचाच हे बाहेरचे फायदा घेतात. पण हे आमच्या लक्षात येत नाही. असो... हा आजचा विषय नाही. आज आनंद साजरा करायचा तो एका तडफदार मराठी नायकाच्या यशाचा....
राज ठाकरेंनी बाहेरुन येऊन मुंबई स्वतःची जहागीर असल्याच्या थाटात जे वावरत होते त्यांना धडकी भरविली आहे यात काही संशय नाही.

जय महाराष्ट्र !!! जय हिंद !!!

- सागर

No comments: