Wednesday, August 27, 2008

कोसीचे अश्रू

कालच मी सगळ्या न्यूज चॅनल वर एकच बातमी सविस्तर पणे पहात होतो.बिहार मध्ये कोसी नदीने कहर केला त्याची बातमी होती ती.

न्यूज चॅनल सगळे एकजात प्रसिद्धीसाठी एकाच बातमीचा मोठा प्रपोगंडा करुन खूप मारा करतात हे खरे आहे.पण जे काल मी पाहीले त्यात विदारकताही तितकीच होती.

मनापासून सांगतो, मी राज ठाकरे यांचा भक्त आहे. मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, मराठी संस्कृतीसाठी, एवढ्या पोटतिडकीने भांडणारा एकही माणूस मी पाहीला नाही. अवघा महाराष्ट्र राज ठाकरे यांच्या मागे उभा राहिला पाहिजे. मी अधून मधून कधीतरी मुंबईला जातो तेव्हा लोकल मधून प्रवास करणारे यूपी-बिहारी मराठी मुलींना शिट्ट्या मारुन छेडतात तेव्हा रक्तच सळसळते. राज ठाकरे यांचा सध्याचा जो मोठा आक्षेप आहे तो सर्व उत्तर भारतीयांना नव्हे तर "गुंडगिरी" करणार्‍या उत्तर भारतीयांकरिता आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. आपल्या मुली घरातून बाहेर गेल्या की तितक्याच सुरक्षितपणे परत यायला हव्यात हे फक्त मराठी आई-बापांनाच नव्हे तर उत्तर भारतीय आई-बापांकरीता देखील लागू आहे....पण मी बोलत होतो ते बिहारमध्ये कोसी नदीने ढाळलेल्या अश्रूंबद्दल.


न्यूज चॅनल्स गाजावाजा करतात हे खरे आहे. पण त्यामुळेच सत्य सर्वसामान्यांपर्यंत तरी पोहोचते...तिकडे दिल्लीत लालू प्रसाद सांगताहेत की बिहार सरकार काहीच करत नाही. खरे आहे त्यांचे.पण लालूप्रसाद जरी सत्तेवर असते तरी त्यांनी नितिशकुमारांनी जे केले त्यापेक्षा काही वेगळे केले नसते. नदीने १२० किलोमीटरने पात्र बदलले तर त्याला लालूप्रसाद-नितिशकुमार काय करतील


हा आजपर्यंतचा इतिहास आहे की निसर्गाच्या शक्तीपुढे मानवाची शक्ती कायम तोकडी पडली आहे.निसर्गावर आक्रमण केले की त्याचा फटका आपल्याला कधीना कधी बसणारच. तिकडे नेपाळमधे धरण भंगले तर पूर येईन नाहीतर काय होईन? अशा आपत्ती नियोजनाकरिता केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांकडे आपत्ती हाताळण्यासाठी विशेष दले असली पाहिजेत. सामग्री असली पाहिजेत.मी 'वोल्कॅनो' हा एक इंग्रजी चित्रपट पाहिला होता. त्यात अशा प्रकारच्या आपत्ती हाताळण्यासाठी एक विशेष दल असलेले दाखवले आहे. आपल्याकडे अशी आपत्ती आली की सैनिकी सहाय्यता घेतली जाते. मुळात अशी दलेच अस्त्तित्त्वात नाहीत तर सैन्यावर हा ताण पडणारच. सैन्याची कार्यक्षमता लढाई व तत्सम कारणांकरिताच वापरायला हवी.आर्य चाणक्यांनी देखील कौटीलीय अर्थशास्त्रात सैन्याची कामे नेमून दिलेली आहेत. ते जरी आज तंतोतंत पाळले तरी अशा आपत्तींना आपण तोंड देऊ शकू...

मुळात एकसंध भारत होणे गरजेचे आहे. आपण सगळे आपापसात भांडत बसतो. राष्ट्रीय हित कोणीही लक्षात घेत नाही.लोकांच्या आपत्तींवर नेतेलोक दिल्लीत बसून आपल्या पोळ्या भाजतात.

पण २० लाख लोक बेघर झाले, ३० हजारावर लोकांचा पत्ता नाही. अरे एक माणुसकी म्हणून तरी कोणी या घटनेकडे पहावे.... भूकंप झाला , सुनामी आली की लगेच मोठ्या देणग्या गोळा होतात.कोसीचे अश्रू पुसताना मला तरी कोणी दिसत नाही...आता पूर ओसरला तर महामारीचा मोठा धोका आहे. अशा वे़ळी औषधे, अन्न, वस्त्र, निवारा यासाठी सर्सामान्य माणूस केवळ झगडतानाच दिसणार आहे.आपापसातील हेवेदावे अशा वेळी सर्वांनीच बाजूला ठेवावे असे मला वाटते.

माणुसकी पेक्षा जगात कोणतीही गोष्ट मोठी नाही....
देव कोसीचे अश्रू पुसण्यासाठी सर्वांना मदत करण्याची सद्बुद्धी देवो.....


- सागर

No comments: