tag:blogger.com,1999:blog-8907175240661459292024-03-13T06:31:18.320-07:00सोनेरी पहाटUnknownnoreply@blogger.comBlogger16125tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-85185177818384289382011-06-11T09:48:00.001-07:002011-06-11T09:48:37.943-07:00एकी नसल्यामुळे सरकारचे फावते आहे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><br />
लोकांमध्ये सरकारच्या मनमानी कारभाराबद्दल प्रचंड प्रक्षोभ आहे.<br />
पण सर्व जनआंदोलकांमध्ये एकी नसल्यामुळे सरकारचे फावते आहे.<br />
<br />
फोडा आणि झोडा हीच इंग्रजांची नीती काँग्रेस आजपर्यंत वापरत आले आहे.<br />
म्हणूनच सामान्य जनता अण्णा हजारे, रामदेवबाबा व तत्सम इतर लोकनेत्यांमागे जरी जात असली तरी त्यात चार दिवसांची जत्रा होते एवढेच<br />
सरकार मात्र मूग गिळून हा तमाशा बघत बसले आहे.<br />
एकाच व्यासपीठावर अण्णा हजारे, रामदेव बाबा , श्री श्री रविशंकरजी, सर्व धर्मीय संत-इमाम-फादर एकत्र आले तर सरकारची काय हिम्मत आहे की विरोधाने अशी आंदोलने चिरडून टाकण्याची?<br />
<br />
सामान्य जनता आज गांधीजींची ३ माकडे झाली आहेत.<br />
<br />
एकी हेच बळ हा पुस्तकी सुविचार सर्वसामान्य जनता आचरणात आणेन तो दिवस भारताच्या उज्ज्वल भवितव्याचा आहे.<br />
<br />
आजपर्यंत जनतेने नुसत्या पुढच्या अफरातफरीवर नजर टाकली असती तरी हे सरकार पडावे यासाठी ठोस भूमिका घेऊन आंदोलने केली असती.<br />
मतदान करुन ५ वर्षांसाठी सरकार निवडण्याचा हक्क जसा सामान्य जनतेला आहे<br />
तसाच हक्क जर ते सरकार कार्यक्षमतेने काम करत नसेन तर ५ वर्षे पूर्ण होण्याअगोदर खाली खेचण्याचा हक्कही सामान्य जनतेला आहेच.<br />
या हक्काची अंमलबजावणी कोण करते आज?<br />
<br />
विकास होत नसेन तर आपल्या कार्यक्षेत्रातील आमदार - खासदाराला जाब विचारण्याचा अधिकार घटनेने सर्वसामान्य जनतेला दिला आहे.<br />
तो हक्क कार्यक्षमतेने वापरण्याऐवजी आपण या नेत्यांच्या दहशतीखाली दबून जातो.<br />
<br />
नाहीतर<br />
बोफोर्स कांड<br />
विमान खरेदी कांड<br />
कॉमनवेल्थ घोटाला<br />
हवाला घोटाळा<br />
२जी स्पेक्ट्रम घोटाळा<br />
राडिया कांड<br />
आयपीएल कांड<br />
<br />
इत्यादी ... इत्यादी ...<br />
<br />
अशी भ्रष्टाचाराची वाढती कमान असलेल्या नेत्यांना आपण पुन्हा पुन्हा निवडून देता?<br />
<br />
विरोधी पार्टी पण तशीच आहे असे म्हणून आपण भ्रष्ट नेत्यांनाच पुन्हा निवडून देतो. त्यामुळे स्वतःचाच पैसा लुटला जातोय ही जाणीवच जनतेला नाहिये.<br />
५०० रुपयाच्या बिलापैकी<br />
३९० रुपये जेवणाचे असतात आणि ११० रुपये आपण सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅट पोटी देतो हे कोणीतरी बघते का?<br />
<br />
२०-२५ रुपये किलोने मिळणारा तांदूळ (जे गरिबांचे प्रमुख अन्न आहे) तो आज ६० - ७० रुपये किलोने मिळतो आहे. ( चांगला बासमती १०० च्या पुढे मिळतो)<br />
<br />
पेट्रोलचे भाव कित्येक वेळा वाढवले. ३८- ४० रुपयांनी मिळणारे पेट्रोल आज ७० रुपयांच्या च्या पुढे गेले आहे<br />
<br />
<strong><span style="color: blue;">एकत्र व्हा. तरच लोकशाहीचा फायदा सामान्य जनतेला मिळेन. नाहीतर नेतेपणाचा बुरखा पांघरलेले लुटारु तुमच्या कष्टाचा पैसा लुटल्याशिवाय राहणार नाहीत.</span></strong><br />
<br />
<br />
<br />
</div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-39640520360148559552010-12-19T06:57:00.000-08:002010-12-19T06:57:10.541-08:00भारताचे शत्रू कोण? : भाग १ : चीनचे वाढते संकट : यावर एक सकारात्मक चर्चा<span class="comment-name"><a href="http://www.mimarathi.net/users/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8" title="सदस्याचा परिचय बघा.">क्लिंटन</a> यांच्याबरोबर मीमराठी.नेट वर झालेली सकारात्मक चर्चा</span><br />
<span class="comment-name"><br />
</span><br />
<span class="comment-name"></span><br />
<span class="Apple-style-span" style="color: blue;">चीनची अर्थव्यवस्था ’ओव्हरहिट’ होत आहे आणि पुढील काही वर्षांमध्ये ती मंदावेल असे अनेक अर्थतज्ञ म्हणत आहेत.चीनपुढे अजून एक प्रश्न म्हणजे त्यांच्याकडे तरूणांचे घटते प्रमाण! लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये जी पावले उचलली त्याचा परिणाम म्हणून पुढील काही वर्षांत चीनमध्ये त्यांच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळायला पाहिजे तितक्या प्रमाणावर तरूण लोक नसतील असेही म्हणतात.म्हणजे चीनची अर्थव्यवस्था आज जरी १०% ने वाढत असली तरी हा वेग sustainable नाही आणि पुढील १० वर्षांमध्ये तो कमी होणार आहे.</span><br />
<span class="Apple-style-span" style="color: blue;">या घटनेचा भारतावर काय परिणाम होईल असे आपल्याला वाटते?कारण लोकांचे लक्ष अन्यत्र वळवायला चीन सरकार भारतविरोधी कारवाया वाढवेल असे वाटते का?</span><br />
<br />
<br />
<br />
<span class="comment-name"></span><br />
क्लिंटनमहोदय,<br />
हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद. <br />
चीनची अर्थव्यवस्था ओव्हरहीट होते आहे असे मला तरी नाही वाटत. अजून १० वर्षांनंतर तरुण रक्त मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईलच चीनला. तरुण लोकांच्या बाबतीतले अधीकृत आकडे कुठून मिळाले असले तरी त्याचा प्रमुख सोर्स हा चीनच असणार आहे, त्यामुळे ही माहिती खरी असेनच असेही मानायचे काही कारण दिसत नाही. चीनने ज्या संथ गतीने आणि व्यवस्थित नियोजनाने जगातील उत्पादन बाजारपेठ काबीज केली त्या अनुभवावरुन याला फार तर चीनने सोडलेले एक पिल्लू म्हणता येईल. या माहितीवर भुलून जगातले सर्व देश निर्धास्त व्हावेत हाही एक डाव असू शकतो यामागे. चला आत्ता नाही तर काही वर्षांत चीनचे वर्चस्व कमी होईल. अतिशय थंड डोक्याने चीन प्रत्येक पाऊल उचलत आहे. तेव्हा चीन जगाच्या आर्थिक नाड्या प्रभावित करु शकेल असे कोणाला कधी वाटले होते का?<br />
अमेरिका उघडपणे चीनला विरोध नाही करु शकत, त्याचे प्रमुख कारण हे आहे की एकट्या चीनकडे अमेरिकेचे चलन मोठ्या प्रमाणावर आहे. मागेही एकदा यावर भीती व्यक्त केली गेली होती. आपणास कदाचित माहिती असेलच. चीनने त्यांच्याकडचे हे परकीय चलन विकायला काढले तर काय होईल? डॉलर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळेल. त्यानंतर होणारे परिणाम झेलण्याची ताकद अमेरिकेची अजिबात नाहिये. अमेरिका आणि चीन यांच्यात एक मूलभूत फरक आहे. अमेरिका हा सर्वस्वीपणे दुसर्या देशांवर अवलंबून राहणारा देश आहे. तर चीनची भौगोलिक संसाधने, मनुष्यबळाचा योग्य वापर, स्वयंपूर्णता आणि मुख्य म्हणजे कोणतेही धडाडीचे निर्णय घेण्यासाठी लागणारी अनियंत्रित सत्ता या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे उद्या युद्ध झाले तरी दुसर्याच्या घराची आग विझवण्यासाठी स्वतःचे घर कोणी जाळत नाही या उक्तीप्रमाणे अमेरिका निषेध व्यक्त करण्यापलिकडे काही करु शकेल असे वाटत नाही. <br />
भारतावर काय परिणाम होईल? हा महत्त्वाचा विषय आहे<br />
चीनकडे युद्धापूर्वी जगाच्या तोंडावर फेकण्यासाठी कारण असेनच. अरुणाचल प्रदेश हा संवेदनशील विषय आहे त्यामुळे काहितरी कुरापत काढून अरुणाचल प्रदेश बळकावण्याचा प्रयत्न चीन करणारच. या मार्गाने चीन सुरुवात करेन अशी प्रबळ शक्यता आहे. आपल्या सध्याच्या धृतराष्ट्री सरकारने पुन्हा निषेध व्यक्त केला तर चीनला आयताच अरुणाचल प्रदेशातील टापू बळकावता येईल. एक घास पचला की भूक ही वाढतच जाणार. हिटलरने देखील घास घेण्यापूर्वी जी पूर्वतयारी केली होती त्या पद्धतीची आठवण झाल्यावाचून रहात नाही.<br />
असो. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की भारत काय करेल? अशी परिस्थिती खरेच उद्भवली तर?<br />
भारताचे नेते या संधीचा भारताला फायदा करुन देण्याएवढे सक्षम नाहियेत हे खेदाने म्हणावे लागत आहे. चीन हळू हळू उत्पादनाची बाजारपेठ काबीज करत आहे हे काय कळत नव्हते का त्यांना? तेव्हा झोपी केलेला आता कसा जागा होऊ शकेल? ही खरेच चिंतेची बाब आहे. भारताचे उद्योजक जे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे झाले आहेत किंवा मोठे होत आहेत त्यामागे सरकार पेक्षा त्यांची वैयक्तीक मेहनत कारणीभूत आहे. ज्या देशात पैसा दिल्या-घेतल्याशिवाय कामे होत नाहीत तेथे आंतरराष्ट्रीय संधी कशा आपल्या देशात येणार? उत्पादन जगत भारतात यावे यासाठी सरकारने कोणते विशेष प्रयत्न केले आहे असे दिसत नाही. उलट होणार्या गुंतवणूकीत मोडता पाय घालायचे काम मात्र केलेले दिसते.<br />
उदाहरण द्यायचे झाले तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बंगळुरात एक मोठा इन्व्हेस्टर्स सम्मेट आयोजित केला होता. त्याद्वारे आर्सेलर मित्तल यांच्याबरोबर ६०,००० कोटीं गुंतवणुक करण्याचा करार त्यांनी केला. यावेळी केंद्र सरकारचा एकही प्रतिनिधी नव्हता. ओरिसातील पॉस्कोइतकाच हाही महत्त्वाचा प्रकल्प. राजकारणाच्या पुढे पॉस्कोचे बारा वाजले. ५ वर्षांपेक्षा प्रकल्प रखडल्यामुळे पॉस्कोची गुंतवणुक कायम राहील याची खात्री नाही. तीच गोष्ट वेदांताच्या प्रकल्पाची. वेदांताच्या प्रकल्पाचे बारा वाजवून राहूल गांधी भाषणात राजनीती करताना दिसले. प्रकल्पांच्या बाबतीत अडचणी, आक्षेप असू शकतात. पण त्या हाताळायची ही कोणती पद्धत? देशाचे हित राजकारणापुढे देशाच्या नेत्यांना दिसत नाही. कसल्या संधी हेरणार आपण? देशाचे हित जिथे येत तिथे सर्व पक्षांचे नेते एकत्र आले पाहिजे. हे चित्र जेव्हा दिसेन तेव्हा म्हणता येईल की भारताला मोठ्या संधी आहेत.<br />
...इथे थांबतोय. तुमच्या विचारात चांगली खोली जाणवत आहे. आवडेल तुमच्याशी अजून चर्चा करायला.<br />
<br />
<br />
<br />
<span class="Apple-style-span" style="color: blue;">Chinese economy overheating असे गुगलून बघितल्यास अनेक लिंक्स मिळतात.त्यातील सर्वात विश्वासार्ह लिंक म्हणजे ब्लुमबर्ग वरील जानेवारी २०१० मधील <a href="http://noir.bloomberg.com/apps/news?pid=newsarchive&sid=aevGlBpJ6gW8">ही </a>लिंक. त्यात म्हटले आहे की चीनमधल्या प्रॉपर्टीच्या किंमती त्यापूर्वीच्या १८ महिन्यांत सर्वाधिक वेगाने वाढल्या. प्रॉपर्टी मार्केटमध्ये (किंवा इतर कोणत्याही मार्केटमध्ये) स्पेक्युलेटर्सचा बेलगाम संचार हे अशी परिस्थिती उद्भवण्यामागचे एक कारण असते.२००९ मध्ये चीनच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये १.४ ट्रीलियन डॉलर्स, म्हणजे पूर्ण भारताच्या सकल घरेलु उत्पादनाच्या (जीडीपी) जास्त इतकी घरांसाठीची कर्जे दिली गेली.या कर्जांची परतफेड करणे सर्व लोकांना शक्य झाले नाही तर त्यातून कर्जांवर default आणि घरांवर टाच आणि एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर टाच आलेली घरे विकायला आली तर मागणी आणि पुरवठा नात्याने घरांच्या किंमती खाली येणे, त्यामुळे बॅंकांकडून बुडालेल्या कर्जाची रिकव्हरी न होणे आणि त्यातूनच बँका बुडणे हा अमेरिकेत बघितलेला प्रकार होऊ शकतो. बॅंकांना दिवाळखोरी टाळण्यासाठी रिझर्व ठेवावे लागतात. हे रिझर्व लोकांना कर्ज द्यायला वापरता येत नाहीत. सरकारने बॅंकांकडिल रिझर्वची पातळी वाढविण्याचा आदेश काढला. हे सर्व या लिंकमध्ये म्हटले आहे. या लिंकप्रमाणेच बिझनेस स्टॅंडर्ड मध्येही गेल्या आठवड्यात यावरच किमान दोन लेख आले होते.त्यांचा मतितार्थही असाच होता.</span><br />
<span class="Apple-style-span" style="color: blue;">ब्लुमबर्गवरीलच <a href="http://noir.bloomberg.com/apps/news?pid=newsarchive&sid=aIEe5cDkSIWE">या </a>लिंकवर म्हटले आहे की सरकारने आता नवी घरे खरेदी करताना लागणारे down-payment वाढविले. याचे कारण म्हणजे ज्यांना परतफेड करणे शक्य नाही अशांना घरांसाठीची कर्जे घेण्यापासून परावृत्त करणे हेच आहे.</span><br />
<span class="Apple-style-span" style="color: blue;">आता या सगळ्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल?१.४ ट्रिलियन डॉलर ही खूप मोठी अमाऊंट आहे आणि चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकणारी ही अमाऊंट आहे.बॅंकांकडील रिझर्वची पातळी वाढविल्यामुळे बॅंकांकडे कर्जे द्यायला कमी रक्कम हातात उपलब्ध असणार.बेफाम सुटलेला पण unsustainable वाढीचा वेग कमी करायला चीनच्या सेंट्रल बॅंकेने जानेवारी महिन्यात तसेच चीनमधील वाढत्या महागाईला अटकाव करण्यासाठी व्याजाचे दर थोडे <a href="http://www.nytimes.com/2010/01/08/business/global/08chinaecon.html">वाढविले. </a>नंतरच्या काळात प्रॉपर्टी मार्केटमधील घडामोडी लक्षात घेता ते आणखी वाढायची शक्यता आहे.व्याजाचे दर वाढल्यामुळे चीनी उद्योगधंद्यांचा (आणि म्हणूनच चीनी अर्थव्यवस्थेचा) वाढीचा वेग पुढील काळात कमी व्हायची शक्यता आहे. दुसऱ्या लिंकमध्ये म्हटले आहे की सरकारने ही पावले उचलूनही जागांच्या किंमती वाढतच आहेत. तेव्हा याहूनही अधिक पावले उचलणे गरजेचे आहे असे दिसते आणि तसे झाले नाही तर प्रॉपर्टी मार्केटमध्ये वादळ यायची शक्यता आहेच. अमेरिकेत पॉपर्टी मार्केटमध्ये आलेल्या वादळानंतर ३ वर्षे झाली तरी अमेरिकन अर्थव्यवस्था पूर्णपणे सावरलेली नाही आणि २००६-०७ ची परिस्थिती यायला बहुदा अजून दोनेक वर्षे तरी जातील असे वाटत आहे. तसेच चीनमध्ये व्हायची थोडी का होईना शक्यता आहेच. </span><br />
<span class="Apple-style-span" style="color: blue;">त्याचप्रमाणे ageing chinese society असे गुगलल्यास अनेक लिंक मिळतात.पण त्यातील सर्वात विश्वासार्ह लिंक बीबीसीची <a href="http://news.bbc.co.uk/2/hi/asia-pacific/7149330.stm">ही </a>लिंक आहे असे म्हणायला हरकत नसावी.त्यात म्हटले आहे की चीनमधील तरूणांची संख्या कमी होत आहे आणि याचे परिणाम २०३० ते २०५० पर्यंत जाणवतील.चीनने निर्यातीत मोठी झेप घेतली त्याचे कारण म्हणजे चीनमधील स्वस्त लेबर.आज अमेरिकेत वॉलमार्टमध्ये अर्ध्या वस्तू ’मेड इन चायना’ असतात. अजून २० वर्षांनी काम करणारे हात कमी झाले तर मागणी-पुरवठ्याच्या गणिताप्रमाणे मजुरीचे दर नक्कीच वाढतील आणि चीनची competitive edge कमी होईल.</span><br />
<span class="Apple-style-span" style="color: blue;">मला वाटते की पहिल्या कारणामुळे पुढील ५ वर्षांत तर दुसऱ्या कारणामुळे २०-२५ वर्षांनंतर चीनची अर्थव्यवस्थेचा वाढायचा १०-११% दर कमी व्हायची शक्यता आहे. मला वाटते की ही भारतासाठी चांगली संधी आहे.कारण भारतात तरूणांची संख्या मोठी आहे.योग्य ते प्रशिक्षण दिल्यास लोकसंख्या ही liability न राहता एक asset बनू शकते. तसेच देशातील रस्ते,वीज,पाणी याची परिस्थिती सुधारायला हवी.आजही महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यातही ८-१० तास लाईट नसणे ही मोठी नामुष्कीची गोष्ट आहे.निदान हायवेजच्या बाबतीत आज परिस्थिती १० वर्षांपूर्वी होती त्यापेक्षा बरीच चांगली आहे तरीही अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.</span><br />
<span class="Apple-style-span" style="color: blue;">गेल्या ४०-५० वर्षांत चीनने मुद्दाम पाकिस्तानला बलिष्ठ केले याचे कारण बलिष्ठ पाकिस्तान भारतामागे अनंत कटकटी निर्माण करून ठेवेल याची चीनला खात्री होती आणि झालेही तसेच.आणि भारत हा चीनला रिजनल सुपरपॉवर व्हायला प्रतिस्पर्धी नक्कीच होता तेव्हा या प्रतिस्पर्ध्याच्याच मागे द्या कटकटी लावून असे साधे गणित होते. गेल्या महिन्यात चीनने जपानला मागे टाकत जगातील दुसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा प्राप्त केला तेव्हा इकॉनॉमिक टाईम्समध्ये गेल्या काही वर्षांतील भारत आणि चीनच्या जीडीपीचे आकडे आले होते.त्यात म्हटले होते की १९९० मध्ये भारताचे जीडीपी ३१५ बिलियन डॉलर तर चीनचे ३९० बिलियन डॉलर होते.तेव्हा आज जो चार पटींचा फरक दिसतो तो तेव्हा २५% एवढाच होता. तेव्हा निदान १९९० पर्यंत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत चीनला प्रतिस्पर्धी बनायची क्षमता राखून असलेला देश नक्कीच होता.</span><br />
<span class="Apple-style-span" style="color: blue;">समजा चीनचा वाढीचा वेग पुढील २५-३० वर्षांत बऱ्यापैकी मंदावला आणि भारत ७-८% ने वाढत असेल तर भारत हे चार पटींचे अंतर झपाट्याने कमी करेल. तसेच दुसऱ्या कारणाचा अजून २५-३० वर्षांनी सामरिक परिस्थितीवरही परिणाम होईल.कारण शेवटी सैन्यात तरूणांचीच गरज असते. २०१० मध्ये सामरिक आणि अर्थकारण या दोन्ही गोष्टींमध्ये चीनचे भारताच्या तुलनेच मोठेच वर्चस्व आहे.ते यानंतरच्या काळात कमी व्हायची शक्यता आहे म्हणून यातून ’डेस्परेट’ होऊन चीन भारतविरोधी पावले पुढील १० वर्षांत उचलेल असे मला व्यक्तिश: वाटते.</span><br />
<span class="Apple-style-span" style="color: blue;">क्लिंटन </span><br />
<br />
<br />
<span class="comment-name"><br />
</span><br />
<span class="comment-name"></span><br />
<div class="content"> क्लिंटनमहोदय,<br />
नेमके महत्त्वाचे दुवे दिल्याबद्दल धन्यवाद. यातले काही आधी वाचले होते. सविस्तरपणे तुम्ही जे विचार मांडले आहेत त्याच्याशी मी सहमत आहे. तुम्ही म्हणता ती परिस्थिती नक्कीच येऊ शकते जर कोणीही (भारत आणि चीन दोघांनीही) नियमबाह्य वर्तणूक केली नाही तर. भारत चाकोरीबाहेरचे कधी करु शकणार नाही, तेव्हा फक्त उरला चीन. हाच मोठा धोका आहे. सकारात्मक घटनाचक्रात तुम्ही काढलेला निष्कर्ष लगेच पटतो. पण चीन म्हणताच माझे मन सावध होते....<br />
इतिहास बघता, चीन हा जगाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात याव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. एके काळी आखातात खनिज तेलाच्या अमाप साठ्यामुळे ज्या जागतिक अर्थकारणाच्या चाव्या हातात आल्या होत्या ( बर्याच अंशी त्या अजूनही आहेत, पण तीव्रता मात्र कमी झाली आहे). भारत, चीन व इतर सर्व देशांनी जगात सर्वत्र तेलसाठ्यांचे शोध लावल्यामुळे आखातातील देशांच्या शब्दाला जे भरपूर वजन होते ते आता कमी झाले आहे. तद्वतच, चीनला पर्याय भारतच आहे हे जागतिक अर्थकारणाचा वेध घेणार्या देशांना आणि त्या देशातील कंपन्यांना ध्यानी आले तर जग सावरु शकेन. चीन सहजासहजी ही मक्तेदारी जाऊ देईल असे मला तरी नाही वाटत. त्यासाठी भारताला अरुणाचल प्रदेश, सियाचीन आणि मित्र देश पाकीस्तान यांद्वारे त्रास देण्याची परंपरा पूर्वीचीच असली तरी यावेळी चीन नेपाळ देखील निशाण्यावर ठेऊन आहे. नेपाळवर भारताचा एके काळी असलेला प्रभाव आता नाहिसा होतो आहे, याचा अर्थ चीन कित्येक वर्षांपासून नेपाळ या मोहीमेवर काम करत होता.<br />
तुम्ही म्हटल्याप्रमाणे चीनला स्वतःच्याही अडचणी आहेत नाही असे नाही. जसे तैवानसारखे चिमुरडे शस्त्रखरेदीच्या बाबतीत चीनच्या विरोधात उघडपणे जातोय. चीनमधील गृहकर्जांचे संकट जरी मोठे दिसत असले तरी त्याला दोन फाटे आहेत.<br />
१. चीनमधे प्रसारमाध्यमे सर्व बातम्या त्यांच्या मर्जीने देऊ शकत नाहीत, सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे त्यावर. त्यामुळे या आकडेवारीची विश्वासार्हता नक्कीच पणाला लागू शकते. कारण तिबेटच्यावेळी जसे जगाची दिशाभूल केली त्याप्रमाणेच ही खेळी नसेनच असे म्हणता येणार नाही.<br />
२. ही गोष्ट आकडेवारीसकट खरी आहे असे मानले तरीही, चीनची सर्वात जमेची बाजू आहे ती म्हणजे अनियंत्रित सत्ता. त्या जोरावर हा बोजा ते दोन पद्धतींनी कमी वा नाहीसा करु शकतात.<br />
अ. गृहकर्जे घेतलेल्या सर्व कर्मचार्यांच्या पगारातून हफ्ते थेट वळवून घेणे (हे चीनच करु शकते)<br />
ब. विदेशी करन्सी, खास करुन अमेरिकन डॉलर मुबलक प्रमाणावर चीनने साठवला आहे (अशा प्रकारच्या आणीबाणीची तरतूद म्हणूनच ही गोष्ट चीनने केल्याची दाट शंका आहे) तो विकून पैसा उभा करणे. त्यामुळे अमेरिकन डॉलर किती कंगाल होईल याच्याशी चीनला काही कर्तव्य असायचे कारण नाही. पण चीन असे करण्याऐवजी या बागलबुवाचा वापर अमेरिकेला वेठीस धरण्यासाठी करेन असे वाटते. जागतिक बँक, अमेरिकन बँका आणि मुबलक प्रमाणावर मोठ्मोठ्या ऑर्डर्स अमेरिकेला यातून तारून नेतील. पण अमेरिकेची भावना आपण जगाला आर्थिक संकटातून वाचवत आहोत असाच असेल. चीनचा कावा यांच्या लक्षात यायचे कारण मला तरी दिसत नाही.<br />
उरला मुद्दा तो चीनच्या तरुण मनुष्यबळाचा. समजा ही माहिती खरी मानली तरी, येत्या १५-२५ वर्षांत चीनला काहितरी तरुण मनुष्यबळ उपलब्ध होईलच की. आणि अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करणारे चीन दरवर्षी या आकडेवारीवर नजर ठेऊन असेनच. कोणताही कायदा तातडीने अंमलात आणणे चीनसारख्या हुकुमशाही राष्ट्राला सहज शक्य आहे. तरीही या मुद्द्यापासून जगाचा फोकस हलवण्यासाठी वेगळे काही चीन करेल असे नाही वाटत. कारण लक्ष्य दुसरीकडे वळवून मूळ मुद्दा सुटणार नाहीच, उलट युद्धामुळे मनुष्यबळ कमी होण्याचा धोका जास्त. त्यासाठी अनेक बाबी मधे रोडा टाकत आहेत. युद्धजन्य परिस्थिती उद्भवेल तेव्हा पाकिस्तान जास्तीत जास्त दान आपल्या पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करणार हे नक्की. पण चीन हे पाऊल उचलायला कचरत आहे याचे कारण म्हणजे रशियासारखा भारताचा मित्र आणि अमेरिकेचा भारतात असणारा रस. आयटी क्षेत्रामुळे अमेरिका तंत्रज्ञान क्षेत्रात भारतावर मोठ्या प्रमाणावर विसंबून आहे. त्यामुळे युद्ध झाले तर सूचना आणि प्रौद्योगिकी क्षेत्रांत (जेथे वेळेवर कामे होणे अत्यावश्यक असते) प्रचंड खळबळ उडेल. अमेरिकेच्या सर्वसामान्य माणसांना या युद्धाची झळ ताबडतोब पोहोचू शकेल, या एकाच कारणाने अमेरिका चीनला युद्धापासून परावृत्त करेन ही शक्यता खूप आहे. पण भारताच्या हितापेक्षाही अमेरिकेचा स्वतःचाच स्वार्थ त्यात असेन.<br />
एकंदरीत अशा सर्व शक्यतांचा विचार केला तर चीन भारतावर आक्रमण करणार नाही या मताची बुद्धीवंतांनाही भुरळ पडते. पण स्वतःच्या घरात आग लागत असेल आणि ती काही प्रमाणात बलिदान देऊनही स्वतःच्या घरात उब निर्माण करता येत असेल, तर असे सर्व प्रकारचे मार्ग चीन अवलंबेल. एवढंच नव्हे तर भारताशी युद्ध झाल्यामुळे लोकसंख्येचा विस्फोट काही प्रमाणात कमी करता येईल असा अमानुष विचार देखील चीन करु शकेल. भारताचा युद्ध विषयक प्रामाणिकपणा एव्हाना सगळ्या जगाला कळून चुकला आहे की भारत हा फक्त स्वसंरक्षणासाठी युद्ध करेल पण आक्रमण नाही करणार. त्यामुळे अरुणाचल प्रदेशासारखी छोटीशी ठिणगी चीन युद्धासाठी वापरेल आणि मग जागतिक दबाव वाढू लागला की कोणत्याही क्षणी युद्ध थांबवणे चीनला शक्य आहे. युद्धबंदी घोषित केली की भारतीय शस्त्रे म्यान करतात हा आजवरचा अनुभव आहे. <br />
जीडीपी ग्रोथ च्या आकडेवारी कडे नजर टाकली तर भारताची प्रगती नक्कीच कौतुकास्पद आहे पण पुन्हा गाडी राजकारणावरच येते. जिथे सर्वसामान्य लोकांच्या पोटाला अन्न नाही त्या सर्वसामान्यांना वाजवी दरात अन्न उपलब्ध करुन देण्या ऐवजी जीडीपी वाढवण्यासाठी महागाई वाढवणे हा उपाय मला तरी पटत नाही. महागाई वाढवली की सरकारची तिजोरी जास्त भरेल, पण यात ज्याचे उत्पन्न 'जैसे थे' च आहे तो सामान्य माणूस भरडतोय हे माहिती असुनही त्याकडे दुर्लक्ष करणे ही काँग्रेसची नीती पटत नाही. असो. या नीतीचे भीषण परिणाम येत्या काळात दिसून येतीलच. पण तो वेगळा विषय आहे.<br />
<br />
<strong><span class="Apple-style-span" style="color: blue;"><blockquote>चीनमधे प्रसारमाध्यमे सर्व बातम्या त्यांच्या मर्जीने देऊ शकत नाहीत, सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे त्यावर. त्यामुळे या आकडेवारीची विश्वासार्हता नक्कीच पणाला लागू शकते. </blockquote></span></strong><span class="Apple-style-span" style="color: blue;"><strong></strong></span><br />
<span class="Apple-style-span" style="color: blue;">वॉशिंग्टन पोस्टमधील <a href="http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/article/2010/01/10/AR2010011002767.html">ही </a>बातमी बघा.त्यात चीनमध्ये कामाला असलेल्या अनेक वेगवेगळ्या व्यक्तींच्या input वरून चीनमधील प्रॉपर्टी मार्केटमधील फुग्यावर भाष्य केले आहे.त्यात मला सर्वात महत्वाचे वाटते ते Xinhua या न्यूज एजन्सीने गोल्डमन सॅक्सने जागांच्या किंमती पगारापेक्षा बिजींगमध्ये ८०% नी तर शांघायमध्ये ३०% नी वाढल्या असे म्हटले. गोल्डमन सॅक्ससारख्या इन्व्हेस्टमेन्ट बॅंका देशातील विविध macroeconomic parameters वर लक्ष ठेऊन असतातच.आणि त्यातील बदलांनुसार आपले धोरण ठरवतात. प्रॉपर्टी मार्केटमधील या आकडेवारीत सरकारचा हस्तक्षेप किती असू शकेल? कारण लोकांचे पगार आणि जागांच्या किंमती हे दोन्ही मोजता येण्यासारखे घटक आहेत.</span><br />
<strong><span class="Apple-style-span" style="color: blue;"><br />
</span></strong><br />
<blockquote><strong><span class="Apple-style-span" style="color: blue;">गृहकर्जे घेतलेल्या सर्व कर्मचार्यांच्या पगारातून हफ्ते थेट वळवून घेणे (हे चीनच करु शकते) </span></strong></blockquote><strong><span class="Apple-style-span" style="color: blue;"> </span></strong><span class="Apple-style-span" style="color: blue;"><strong></strong><br />
तसे झाले असे गृहित धरले तरी मग चीनी ग्राहकांपैकी मोठ्या सेक्शनकडे हातात पैसा कमी खेळेल.तसे झाले तर त्यांची क्रयशक्ती कमी होईल आणि त्यातून मागणी कमी होईल. मागणी कमी झाली तर त्याचा परिणाम चीनी कंपन्यांवर आणि म्हणून उद्योगधंद्यांवर नक्कीच पडेल. अर्थशास्त्राचे तत्व आहे की मागणी-पुरवठा गणितात कोणताही हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम कोणत्या ना कोणत्या प्रमाणात भोगायला लागतात. हे तत्व आपला प्रभाव दाखवेल!</span><br />
<span class="Apple-style-span" style="color: blue;">अर्थातच असे संकट चीनमध्ये नक्कीच येईल असे नाही पण त्याची शक्यता नक्कीच आहे.</span><br />
<strong><span class="Apple-style-span" style="color: blue;"><br />
</span></strong><br />
<blockquote><strong><span class="Apple-style-span" style="color: blue;">विदेशी करन्सी, खास करुन अमेरिकन डॉलर मुबलक प्रमाणावर चीनने साठवला आहे (अशा प्रकारच्या आणीबाणीची तरतूद म्हणूनच ही गोष्ट चीनने केल्याची दाट शंका आहे) तो विकून पैसा उभा करणे. त्यामुळे अमेरिकन डॉलर किती कंगाल होईल याच्याशी चीनला काही कर्तव्य असायचे कारण नाही. </span></strong></blockquote><strong><span class="Apple-style-span" style="color: blue;"> </span></strong><span class="Apple-style-span" style="color: blue;"><strong></strong>२००९-१० मध्ये चीनचे जीडीपी सुमारे ५ ट्रिलियन डॉलर होते तर त्यात निर्यातीचा वाटा सुमारे १.२ ट्रिलियन. हे आकडे सी.आय.ए फॅक्टबुकमधून मिळू शकतील.म्हणजे चीनच्या अर्थव्यवस्थेत निर्यातीचा वाटा सुमारे २४% आहे.जर अमेरिकन डॉलर पत्त्यासारखा कोसळला तर म्हणजेच चीनी युआन डॉलरच्या तुलनेत भरमसाठ महाग होईल.तसे झाले तर चीनी वस्तू अमेरिकेत महाग मिळायला लागतील आणि आपोआपच चीनमधून अमेरिकेत होणारी आयात (चीनची निर्यात) कमी होईल.तसे झाले तर चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईलच.कारण २४% हा आकडा थोडा नाही.किंबहुना गेली अनेक वर्षे चीनने सरकारी हस्तक्षेप करून युआनची किंमत डॉलरच्या तुलनेत कमी ठेवली आहे.जर मागणी-पुरवठ्याचे गणित चालले आणि विनिमय दर ठरविण्यात सरकारचा काहीच हस्तक्षेप नसेल तर डॉलरचा दर कमी होईल आणि त्याचा फटका चीनी निर्यातीला बसेल.</span><br />
<span class="Apple-style-span" style="color: blue;">२००७ मध्ये अमेरिकेतील इन्व्हेस्टमेन्ट बॅंक मॉर्गन स्टॅनले ला सबप्राईम क्रायसिसमध्ये सुमारे ९ बिलियन डॉलरचा तोटा झाला.त्यावेळीच १९ डिसेंबर २००७ रोजी चीनच्या Sovereign Wealth Fund ने (मराठी शब्द?) मॉर्गन स्टॅनलेमध्ये ५ बिलियन डॉलरची गुंतवणुक केली.इतकेच नव्हे तर जून २००९ मध्ये परत १.२ बिलियन डॉलरची गुंतवणुक केली! जून २००९ मध्ये चीनने केलेल्या गुंतवणुकीमुळे मॉर्गन स्टॅनलेला अमेरिकन सरकारचे TARP मधून मिळालेले पैसे परत करता आले. जर अमेरिकन अर्थव्यवस्थेचे नुकसान चीनला करायचे असते तर मॉर्गन स्टॅनलेमध्ये चीनने गुंतवणुक का केली असती? चीननेच नव्हे तर सिंगापूर, अबु धाबी, नॉर्वे येथील Sovereign Wealth Funds नी पण अमेरिकन अर्थव्यवस्थेत त्यावेळी गुंतवणुक केली होती. याचे कारण सध्याच्या काळात अमेरिकेसारखी मोठी अर्थव्यवस्था कोसळली तर त्याचा परिणाम सर्व देशांवर होईल. त्यासाठी कोणी तयार नसते. </span><br />
<strong><span class="Apple-style-span" style="color: blue;"><br />
</span></strong><br />
<blockquote><strong><span class="Apple-style-span" style="color: blue;">अमेरिका चीनला युद्धापासून परावृत्त करेन ही शक्यता खूप आहे. पण भारताच्या हितापेक्षाही अमेरिकेचा स्वतःचाच स्वार्थ त्यात असेन. </span></strong></blockquote><strong><span class="Apple-style-span" style="color: blue;"> </span></strong><span class="Apple-style-span" style="color: blue;"><strong></strong>अर्थातच. अमेरिकेने भारताचे हित बघावे ही अपेक्षा करणेच चुकीचे आहे.</span><br />
<span class="Apple-style-span" style="color: blue;">मला वाटते की चीन पुढील काही वर्षात अरूणाचल प्रदेश, सिक्कीममध्ये काहीतरी कुरापती काढ, छोट्यामोठ्या चकमकी कर, त्याहूनही महत्वाचे म्हणजे ब्रम्हपुत्रा नदीवर धरणच बांध म्हणजे पूर्वोत्तर भारतात किती पाणी जावे हे चीन ठरविणार, पाकिस्तानच्या करवी आणखी त्रास दे हे प्रकार जास्त करेल. कदाचित छोटे युध्द पण होईल पण ते Full scale युध्द होऊ नये याची काळजी चीन घेईल असे मला वाटते. याचे कारण <a href="http://www.globalsecurity.org/wmd/world/india/agni-iii.htm">इथे </a>म्हटल्याप्रमाणे भारताच्या अग्नी-३ क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीनमधली महत्वाची शहरे आहेत आणि अग्नी-३ क्षेपणास्त्र २०० किलोटनपर्यंतची अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. हिरोशिमावरील बॉम्ब हा सुमारे १३ ते १८ किलोटनचा होता.तेव्हा भारत चीनची मोठ्या प्रमाणावर हानी करू शकतो हे तर नक्कीच.आता स्वत:चेच नुकसान करून चीन भारताचे नुकसान करेल का हे सांगणे नक्कीच कठिण आहे. माओने लाखो लोकांना मारले पण सध्याच्या काळात प्रशिक्षित मनुष्यबळाचा आणि त्यायोगे केलेल्या आर्थिक प्रगतीचा नाश चीन करवून घेईल का नाही या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे नाही.</span><br />
<span class="Apple-style-span" style="color: blue;">क्लिंटन</span><br />
<br />
<br />
माफ करा. अचानक उद्भवलेल्या काही कारणास्तव येथे यायला जमले नाही<br />
सविस्तर प्रतिसाद नंतर देईनच उद्या. पण आज वाचलेली बातमी देतो आहे थोडक्यात<br />
चीनचा नेपाळमध्ये सहभाग उघडकीस आला आहे. माओवादी नेत्यांना एक कोटी रुपये प्रत्येक सांसद याप्रमाणे विकत घेऊन चीनच्या आधाराचे सरकार स्थापन करण्याचा कट उघडकीस आला आहे. विदेश नीतीत भारत सरकार झोपले आहे हेच दिसून येते<br />
<a href="http://economictimes.indiatimes.com/news/politics/nation/Nepal-Maoists-seek-cash-from-Chinese-friend-to-buy-MPs/articleshow/6494148.cms">इथे</a> ही बातमी वाचायला मिळेल<br />
<br />
<br />
क्लिंटनमहोदय,<br />
आज थोडे सविस्तर लिहायला मिळते आहे. अजून परामर्श घेऊयात या विषयाचा.<br />
<ins>Xinhua या न्यूज एजन्सीने गोल्डमन सॅक्सने जागांच्या किंमती पगारापेक्षा बिजींगमध्ये ८०% नी तर शांघायमध्ये ३०% नी वाढल्या असे म्हटले. गोल्डमन सॅक्ससारख्या इन्व्हेस्टमेन्ट बॅंका देशातील विविध macroeconomic parameters वर लक्ष ठेऊन असतातच.आणि त्यातील बदलांनुसार आपले धोरण ठरवतात. प्रॉपर्टी मार्केटमधील या आकडेवारीत सरकारचा हस्तक्षेप किती असू शकेल? कारण लोकांचे पगार आणि जागांच्या किंमती हे दोन्ही मोजता येण्यासारखे घटक आहेत.</ins><br />
नक्कीच मोजता येणारे घटक आहेत पगार आणि किंमती.<br />
पण येथे हे लक्षात घेतले पाहिजे की 9,598,094 एवढे प्रचंड स्केअर कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या चीनला बीजींग (16,801.25 वर्ग कि.मी.) आणि शांघाय (3,298.3 वर्ग कि.मी.) या दोन शहरांमुळे हे प्रॉपर्टी संकट हाताळावे लागणार / लागत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत या दोन शहरांबरोबर बाकीचा चीनही हातभार लावतोच आहे.<br />
बीजींग मधील पर कॅपिटा जीडीपी ही कमीत कमी १० हजार अमेरिकन डॉलर्सच्या पुढे आहे आणि सरासरी ती १७ हजार डॉलर्सच्या पुढे आहे. तर शांघायचे सरासरी उत्पन्न ११ हजार अमेरिकन डॉलर्सच्या पुढे आहे याही बाबी विचारात घेतल्या पाहिजे.<br />
या जीडीपी वाढीचा दर शांघायचा ८.२ आहे तर बीजींग चा त्यापेक्षाही जास्त आहे.<br />
मी कदाचित युद्ध या पर्यायाने लेखन केले असल्यामुळे उच्च तीव्रतेचा विचार त्यात प्रकटला हे मी नाकारत नाही. पण युद्धाच्या शक्यतेत एक्स्ट्रीम गोष्टीच जास्त होतात हा इतिहास आहे.<br />
अर्थात सद्य परिस्थिती अजूनही चीनच्या हाताबाहेर नाही गेली. त्यामुळे अनेक उपायपद्धती वापरुन चीन यातून बाहेर येऊ शकेल. जसे<br />
१. बीजींग व शांघाय यांच्या आराखड्यांसारखी इतर शहरे विकसित करणे ( जे चीन ने दोन दशकांपूर्वीच सुरु केले आहे. पण उद्योगधंद्यांसाठी या दोन शहरांची पसंती इतर शहरांना देण्यात तितकेसे यश त्यांना मिळाले नाहिये. हाँगकाँग च्या रुपाने चीन क्षितिज विस्तारित आहेच पण डल्यान, सिच्वान, व तत्सम इतर प्रांत प्रगतीपथावर म्हणवे तितक्या वेगाने जात नाहियेत. गिलगिट बाल्टीस्तानात दाखवलेली चपळाई चीनने या क्षेत्रात दाखवली तर कमी कालावधीत या समस्येवर चीन नियंत्रण मिळवू शकेल.<br />
२. वारेमाप वाढलेल्या किंमती नियंत्रणात आणणे ( ही समस्या फक्त बीजींग व शांघायपुरती मर्यादीत असल्यामुळे सक्तीने काही पावले चीन उचलेल.) दुसर्या घरासाठी कर्ज हवे असल्यास कमीत कमी ४०% कर्जदाराचा हिस्सा हवा ही अट त्याचीच सुरुवात म्हणता येईल.<br />
३. मोठे संकट टाळण्यासाठी पर कॅपिटा उत्पन्न वाढवणे (अर्थात ही काही चांगली योजना नाही ठरणार.)<br />
४. अनेक वेगवेगळे मार्ग आहेत पण चीनमध्ये अर्थतज़्ज्ञांचा तुटवडा नाहिये हे ही विचारात घेतले पाहिजे.<br />
<ins>अमेरिकन अर्थव्यवस्थेचे नुकसान चीनला करायचे असते तर मॉर्गन स्टॅनलेमध्ये चीनने गुंतवणुक का केली असती?</ins><br />
माझे मत हे फक्त आणीबाणीसाठी होते जिथे चीन फक्त स्वतःचा विचार करेन. जेव्हा युद्ध होईल तेव्हा आंतरराष्ट्रीय समुदाय चीनला विरोध करणारच पण अमेरिकेला डॉलरच्या अवमूल्यनाच्या दबावाखाली ठेवून हा विरोध बोथट करण्याकडे चीनचा कल राहिन असे मला वाटते. कारण डॉलरचे अवमूल्यन चीनला होणार्या तोट्यापेक्षा अमेरिकेला कधीच परवडणारे नाहिये आणि हीच गोष्ट चीन पुरेपुर ओळखून आहे. अमेरिकन कंपन्यांमध्ये चीनची गुंतवणूक नक्कीच आर्थिक बाबी गृहीत धरुन केल्या गेलेल्या आहेत यात शंका नाहीच आहे. मी जी शक्यता सांगितली ती केवळ आणीबाणीची वेळ आली तर चीन वापरु शकेल अशाकरिता होती. अर्थात मी अजून स्पष्टपणे यावर लिहायला हवे होते...असो..<br />
<ins>महत्वाचे म्हणजे ब्रम्हपुत्रा नदीवर धरणच बांध म्हणजे पूर्वोत्तर भारतात किती पाणी जावे हे चीन ठरविणार, पाकिस्तानच्या करवी आणखी त्रास दे हे प्रकार जास्त करेल. कदाचित छोटे युध्द पण होईल पण ते Full scale युध्द होऊ नये याची काळजी चीन घेईल असे मला वाटते. </ins><br />
ह्या बाबी जास्त चिंतेचा विषय आहेत भारतासाठी. आत्ता नाही म्हणणारे चीन नंतर ब्रह्मपुत्रेचा प्रवाहच चीनकडे आत मध्ये वळवू शकेल. तेव्हा भारत काही करु शकेल असे वाटत नाही. ब्रह्मपुत्रा चीनने वळवली तर ते त्यांच्या देशातले बांधकाम असेन आणि त्यावर आपले सरकार अर्ज विनंत्यांच्या वाटेशिवाय युद्ध हा मार्ग पत्करेल काय? हा मोठा नजर ठेवण्याचा विषय आहे.<br />
-------------------<br />
अजून थोडेसे:<br />
चीनचा इतिहास पाहिला तर चीन हा विस्तारवादी नीतीचा अवलंब करणारा देश आहे.<br />
त्याच्या आड येणार्या कोणत्याही घटनेचा, प्रसंगाचा वा देशांचा चीनने मुलाहिजा ठेवला नाही हे स्पष्टच दिसते<br />
पाहूयात त्या घटना:<br />
-----------<br />
४ जून १९८९ : तिआनामेन चौकात झालेल्या आंदोलनावर चीनच्या सैन्यदलाने हल्ला केला. त्यात हजारो आंदोलक ठार झाले.<br />
१९९७ : हाँगकाँगचा चीनमध्ये विलीनीकरण.<br />
मार्च २००८ : तिबेटमध्ये चीनविरोधात जोरदार आंदोलन. पण, चीनच्या सैन्यदलाने हे आंदोलन हाणून पाडले. शेवटी तिबेट चीनमध्ये समाविष्ट झाले.<br />
ऑगस्ट २००८ : बीजिंगमध्ये ऑलिम्पिक स्पध्रेचे आयोजन.<br />
जुलै २००९ : झिनजिआंग येथे धार्मिक हिंसाचार. २०० ठार<br />
एवढ्यांत : जम्मू काश्मीरच्या लोकांना एका वेगळ्या कागदावर चीनचा व्हिसा देणे. (यातच जम्मू काश्मीर भारताचा भाग नाहीये हे चीन अगदी स्पष्ट करतो आहे.<br />
गिलगिट-बाल्टीस्तानात चीनचे सैन्य.<br />
-----------<br />
भारत चीनला दबावात आणण्यात कसे अपयशी ठरले ते थोडक्यात पाहूयात.<br />
एकीकडे आपण तिबेटचे सर्वोच्च नेते दलाई लामा यांना भारतात आश्रय दिला, पण दुसरीकडे तिबेटला चीनचा अविभाज्य भाग म्हणूनही मान्यता दिली. येथे आपल्या कूटनीतीतज्ज्ञांचा कोणताही मुत्सद्दीपणा दिसला नाही. एक काहीतरी ठाम भूमिका घ्यायला हवी होती. दोन्ही दगडांवर पाय ठेवायची नीती कोणाच्याही डोक्यापलिकडचीच आहे.<br />
भारत अजूनही काय करु शकतो?<br />
तिबेटला चीनचा हिस्सा मानायला नकार देणे ( चीनच्या व्हिसा प्रकरणी उत्तर देण्यासाठी ही नामी संधी आहे. तिबेटी लोकांना वेगळा व्हिसा द्यायला सुरुवात करायला हवी)<br />
तैवानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून आंतरराष्ट्रीय मंचावर मान्यता देणे व त्यासाठी प्रयत्न करणे.<br />
----<br />
गिलगिट बाल्टीस्तानात १७ वेगवेगळ्या परियोजना चालू आहेत. २२ ठिकाणी गुप्त खणन कामे चालू आहेत जिथे जायची पाकीस्तानच्या सैन्यालाही परवानगी नाही. ही सामरिक मोर्चेबांधणी आहे हे स्पष्ट दिसते आहे. भारताच्या अग्नि, ब्रह्मोस या मिसाईल्स ना चीनच्या हद्दीवरच रोखण्यासाठी क्षेपणास्त्ररोधी क्षेपणास्त्रे (इराकयुद्धातील पॅट्रियट च्या धरतीवरती) तैनात करणे व चीनची सीमा सुरक्षित करणे हा अगदी स्पष्ट हेतू आहे चीनचा. झिन्झियांग प्रांतात यघुर मुसलमान बाहुल्य आहे. त्यांना तुर्कमेनिस्तान, गिलगित-बाल्टीस्तान व झिनझियांग या प्रांताचे एक वेगळे राष्ट्र हवे आहे. चीनचे वा पाकिस्तानचे वर्चस्व त्यांना नको आहे.<br />
या गिलगिट बाल्टीस्तानमुळे चीनने कायकाय साध्य केले ते पहा<br />
- आखाती देश केवळ २ दिवसांच्या अंतरावर आणून ठेवले (युद्धकाळात तेलाची सोय)<br />
- झिनझियांग प्रांतावर थेट लक्ष<br />
- पाकिस्तानला दबावाखाली<br />
- तिबेट व नेपाळ यांच्याकडे पूर्णतयारीने लक्ष<br />
भारताने काय केले? केंद्र सरकारने फक्त निषेध नोंदवला आणि आम्ही लक्ष ठेऊन आहोत अशी दर्पोक्ती केली. वायुसेनाअध्यक्षांनी काय केले? दिल्लीत आलिशान कमर्यांत ए.सी.कॅबिनच्या आनंदात मग्न राहणार्या अकार्यक्षम नेतृत्त्वाच्या मदतीची वा आदेशाची वाट न पाहता थेट सर्व सीमांवर युद्धविमाने आणून ठेवली.<br />
यामुळे मात्र चीनवर दबाव आला.<br />
---<br />
<strong>१९६२ च्या युद्धात चीनने ३,५०० वर्ग कि.मी. भारताची भूमी लाटली आहे. </strong>त्यासाठी १९९४ मध्ये तत्कालीन केंद्रसरकार ने संसदेत ठराव संमत केला होता की अक्साई चीन व पीओके पुन्हा मिळवू म्हणून. सध्याचे नेते राष्ट्रहिताचे जुने संकल्प विसरत चालले आहेत ही खेदाचीच बाब म्हणावी लागेल.<br />
<strong>चीनने केवळ २००८ या साली २७० वेळा भारतीय सीमेत घुसखोरी केली आहे.</strong><br />
हे फक्त पत्रकारांपर्यंत पोहोचलेले आकडे आहेत हे. आपण प्रत्यक्ष परिस्थितीची कल्पनाच करु शकतो.<br />
सध्याचे आकडे उपलब्ध नाही झाले. पण आता तरी भारताने चीनच्या विस्तारवादी नीतीला आळा घालण्यासाठी आक्रमक भूमिका पत्करणे गरजेचे आहे. नाहीतर चीनचे पुढचे पाऊल अरुणाचल प्रदेश मध्ये आहे यात संशय नाही.<br />
तुमचे काय म्हणणे आहे यावर? आपली मते जाणून घ्यायला आवडेल<br />
<br />
<br />
<br />
</div><div class="links"> <ul class="links"></ul></div>Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-27395217203971189412010-12-19T06:48:00.000-08:002010-12-19T06:52:19.553-08:00भारताचे शत्रू कोण? : भाग १ : चीनचे वाढते संकटभाग १ : चीनचे वाढते संकट<br />
आधी काही ताज्या बातम्या देतो. मग या विषयाचा समाचार घेऊयात.<br />
<br />
१. <a href="http://72.78.249.107/esakal/20100829/4663488821886127983.htm">गिलगीट-बाल्टिस्तानात आहेत चिनी सैनिक</a><br />
२. <a href="http://72.78.249.107/esakal/20100829/5198389166139744239.htm">भारत-चीन लष्करी संबंध सर्वसाधारण स्वरूपाचे</a><br />
३. <a href="http://72.78.249.107/esakal/20100827/5090721802587478318.htm">लष्करी अधिका-याच्या दौ-यास चीनचा नकार</a><br />
४. <a href="http://72.78.249.107/esakal/20100828/5249737037766056066.htm">चीनची कुरापत; भारताचे चोख प्रत्युत्तर</a><br />
५. <a href="http://72.78.249.107/esakal/20100831/5546264601879764423.htm">चीनच्या वाढत्या हालचाली चिंताजनक</a><br />
<br />
चीन एक जगातील एक समर्थ आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. गेल्या कित्येक दशकांत चीनची होत असलेली प्रगती त्यांच्याकडे एक ठोस योजना असल्याचे स्पष्टपणे दाखवते. एखादा देश स्वबळावर मोठा होत असेल तर ती नक्कीच कौतुकास्पद गोष्ट असते. भारतही हळू हळू मोठा होतो आहे. पण भारत आणि चीन या दोघांच्या मोठे होण्यात फरक आहे. भारतात लोकशाही आहे तर चीनमध्ये कम्युनिस्ट राज्य करत आहेत. कम्युनिस्ट म्हणजे थोडक्यात हुकुमशाही. का हा प्रश्न नाही विचारायचा?<br />
<br />
भारत उद्या कितीही मोठा झाला तरी जगाला एक खात्री आहे की सत्तेचा दुरुपयोग भारताकडून होणार नाही. या खात्रीला एक निश्चितता म्हणता येईल. याचे श्रेय सरकारच्या धोरणापेक्षा प्रामाणिकपणे जगभर काम करत असलेल्या सर्व भारतीयांना दिले पाहिजे. <br />
<br />
चीनने काय केले? चीन हा खूप महत्त्वाकांक्षी आहे. चीन ने (युद्धाच्या स्वरुपात) रक्ताचा थेंब न सांडता तिबेट घशात घातला. तिबेटच्या स्थानिकांचा विरोध असूनही चीन हे करु शकला कारण तिबेटमधील आवाज जगापर्यंत पोहोचू न देण्याची दक्षता त्यांनी घेतली होती. तिबेट बळकावण्यापूर्वी चीनने काय काय केले हेही पाहुयात.<br />
<br />
चीन ने देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले मनुष्यबळ सक्तीने उपयोगात आणले. चीनचा आकार, भौगोलिक फायदा आणि उपलब्ध संसाधने यांच्या जोरावर चीनने आधी उद्योग जगत काबीज केले. <br />
चीनने आधी व्यवस्थित अभ्यास केला की जगात कोणत्याही वस्तूचे उत्पादन करणे हे प्रत्येक कंपनीला खर्चाचे पडते आणि त्यामुळे त्या कंपन्यांना नफा हा मर्यादित मिळतो. वाचकहो नीट लक्ष देऊन हा मुद्दा समजून घ्या. जगातील कोणतीही कंपनी धंदा करते त्याचे उद्दीष्ट केवळ एकच असते - जास्तीत जास्त नफा मिळवणे. नेमकी हीच नस पकडून चीनने काय केले? या सर्व मोठ्या कंपन्यांना लक्ष्य केले. आमच्या देशात तुम्ही उत्पादन सुरु करा तुमचा खर्च कमी होईल व नफा देखील वाढेल. सरळ सरळ धंद्याचा विचार करणारा कोणीही हेच करेन. मुख्यकरुन त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत असलेल्या संधी बरोबर हेरल्या. हळू हळू चीनमध्ये उत्पादनांचा धूर निघू लागला. स्वस्त उत्पादनामुळे कंपन्यांचा पैसा वाचू लागला व उत्पादनही जास्त संख्येने होऊ लागले. हा पैसा जाहिरात व तत्सम मार्केटींग वर खर्च केला गेला. त्यामुळे कंपन्यांचे विक्रीचे आकडे वाढू लागले. सर्व प्रकारचे उत्पादन चीन ने केले. अमेरिकेतील संगणकांतील चिप्स, मोबाईल हँड्सेट्स, मुख्यत्वेकरुन खेळणी या सर्वांपासून टॉयलेटमध्ये वापरले जाणारे टॉयलेट पेपर, पेपर नॅपकिन्स हे देखील चीन मध्ये तयार होतात.<br />
<br />
चीनने जगाला अशी सवय लावली होती की स्वस्त उत्पादनाचे दुसरे नाव चीन झाले. त्यामुळे चीनकडे पैसा वाहू लागला. चीनने काय केले? या पैशांतून मोठ्मोठी धरणे, मोठमोठी बांधकामे, रस्ते, रेल्वेमार्ग अशा इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठ्या प्रमाणावर जाळे उभे केले. <br />
<br />
स्वस्तात उपलब्ध असलेला माल व स्वस्तातले मनुष्यबळ ह्या जोरावर चीन आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार करत गेला. हळुहळू चीनला या इन्फ्रास्ट्रक्चर क्षमतेचे सामरिक महत्त्व कळून आले. आता ड्रॅगनच्या पंज्यात बळ आले होते. तिबेटचा घास जगाच्या (किरकोळ) विरोधाला न जुमानता गिळला होता. आता चीनची नजर आहे ती अरुणाचल प्रदेश, सियाचीन, गिलगीट-बाल्टिस्तान या भागांवर. तुम्हाला कदाचित आश्चर्यदेखील वाटू शकेल पण नेपाळही या यादीवर आहे. त्यादृष्टीने नेपाळमधील (आणि भारतातीलही) माओवाद्यांना शस्त्रपुरवठा छुप्या मार्गाने सुरु आहेच, पण नेपाळमधील राजकारणात पडद्याआड मोठी खेळायच्या प्रयत्नात आहे चीन. भारताच्या लेह मधील सीमेलगतचे रस्त्याचे बांधकाम चीनने बंद पाडले होते. त्यावेळी आपण फक्त निषेध व्यक्त करुन स्वस्थ बसलो. तो रस्ता पूर्ण झाला की नाही? का काम सोडून दिले काही पत्ता नाही. आम्ही कोणासमोर झुकणार नाही असे म्हणून आपले परराष्ट्र खाते कायमच झुकत आले आहे. आपले लोकनियुक्त सरकार फक्त लक्ष ठेवून आहे. आजची बातमी ही आहे की चीनचा इंटरेस्ट हिंदी महासागरातही वाढायला लागला आहे. त्यावर आपले परराष्ट्रमंत्री यांचे स्टेटमेंट वाचले - " ही बाब चिंताजनक आहे, पण आम्ही लक्ष ठेवून आहोत" म्हणजे काय? बोलायची गरज आहे का यावर?<br />
वुई कन्डेम्नड् सच अॅक्टीव्हिटीज असे म्हणून शत्रू काय घुसखोरी थांबवणार आहे काय?<br />
असो.<br />
<br />
पाकीस्तानच्या रुपाने चीनला एक मोठी संधी दिसत आहे. पाकीस्तानला भारताविरुद्ध सर्व प्रकारची मदत चीन करत आहे. गिलगीट-बाल्टिस्तानात मोठमोठे बोगदे खणणे, मोठे रस्ते बांधणे, रेल्वेमार्ग उभारणे या सर्व साधनांद्वारे चीन आखाताच्या दोन दिवसांच्या अंतरावर आला आहे. हे कशासाठी? व्यापारासाठी? अजिबात नाही. चीन हळूहळू युद्धाच्या दिशेने पावले टाकतो आहे. युद्धात सर्वात जास्त काय वापरले जाते? दारुगोळा चालवण्यासाठी जी मशिनरी लागते त्यांसाठी लागणारे इंधन. आखात जवळ आले की तेलाचा खूप मोठा पुरवठा आणि तो ही ताबडतोब चीनला होणार आहे. पाकीस्तानची मैत्री चीन फक्त भारताविरोधातच नव्हे तर आखाती देशांतील इस्लामी राष्ट्रांचे हितसंबंध जपण्यासाठीही वापरत आहे. तेलाची खरेदी गेल्या काही वर्षांत चीनने जेवढी केली तेवढी कोणीच केलेली नाहिये. चीनकडे याक्षणी प्रचंड तेलसाठा आहे. भारतीय सीमेलगत कित्येक ठिकाणी हे तेलसाठे चीन साठवत आला आहे. युद्धाच्या वेळी काश्मीर च्या मोबदल्यात पाकीस्तानकडून चीनला काय अपेक्षा आहे? भारताविरुद्ध अतिरेकी कारवायांचे प्रमाण वाढवणे आणि सियाचीन व अरुणाचल प्रदेशातील जेवढा टापूं चीन व्यापेल त्याला समर्थन देणे. <br />
<br />
चीनच्या या तयारीच्या तुलनेत भारताची काय तयारी आहे?<br />
<em>मेनन म्हणाले, की चीन सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक महासत्तेचा दर्जा मिळविण्यात अधिक व्यस्त आहे. युद्ध करून चीन ते स्थैर्य धोक्यात आणण्याची शक्यता नाही.</em> असे बेजबाबदार वक्तव्य करुन मेननसाहेब (हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत) स्वप्नात जगत आहेत असे मला तरी वाटते. जो सामर्थ्याकडे वाटचाल करतो आहे आणि ज्याला जमीनीची तहान आहे तो चीन भारताशी युद्ध करणार नाही या भ्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने रहावे? भारताकडे किती पाणबुड्या आहेत? किती लष्करी जहाजांचे उत्पादन दरवर्षी भारतात होते? किती विमाने खरेदी केली जातात? किती तोफा अद्ययावत आहेत? लष्करी शस्त्रे व अस्त्रे यांबाबतीत एक क्षेपणास्त्र सोडले तर आपला देश सगळ्या महत्त्वाच्या संसाधनांसाठी दुसर्या देशावर अवलंबून आहे. आकड्यांच्या तुलनेत भारत चीनपुढे कुठेही टिकत नाही. युद्ध हे कोणत्याही राष्ट्राला परवडत नाही. पण असे होणारच नाही असे गृहीत धरणे म्हणजे मेंदूला ज्वर आल्याचे लक्षण नाही का?<br />
<br />
भारतीय परराष्ट्र मंत्रालय चीनबरोबर सामरिक देवाणघेवाणीचे करार करत आहे. त्या अनुषंगाने भारताचे काही लष्करी अधिकारी चीनला भेट देणार आणि चीनचे लष्करी अधिकारी भारताला भेट देणार. लेफ्टनंट जनरल बी. एस. जसवाल यांच्या दौर्यावर चीनने आक्षेप घेतला नसता तर लोकांना ही गोष्ट कळाली असती की नाही हे माहिती नाही. पण यापेक्षा भयानक गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की जसवाल प्रकरणी प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ज्या चीनी अधिकार्यांचा दौरा रद्द केला त्याबद्दल कोणी काही माहिती घेतली आहे का? या दौर्याच्या वेळी चीनचे हे अधिकारी पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अॅकॅडेमी (एनडीए) येथे भेट देणार होते. हे सत्र कधीपासून चालू आहे हे सरकारलाच माहिती. <em>जसवाल यांची नियुक्ती जम्मू व काश्मीरसारख्या संवेदनशील भागात आहे. तेथील लोक वेगळे पारपत्र (व्हिसा) घेऊन येतात. जसवाल काश्मीरमधून येत असल्याने त्यांना चीनच्या दौर्याची परवानगी देता येणार नाही,' असे चीनतर्फे भारताला कळविण्यात आले.</em> असे असताना एनडीए ही देशातील सर्वोत्कृष्ट लष्करी अधिकारी निर्माण करणारी संस्था आहे. शेजारचे राष्ट्र सामरिकदृष्ट्या बलवान होत असताना देशातील सर्वोत्कृष्ट लष्करी अधिकारी निर्माण करणार्या संस्थेची गुपितं उघड करणे याला कोणत्या बुद्धीचे परराष्ट्र धोरण म्हणता येईल? ही गोष्ट राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणू शकते एवढी साधी गोष्ट सरकारच्या ध्यानात येऊ नये?<br />
<br />
चीनचा ड्रॅगन आपले पंजे आधी बळकट करतो आहे आणि मगच हळूहळू पाय पसरतो आहे. चीनची ही नीती लक्षात येत नसेल तर आपले पराष्ट्र धोरण आखणारे सरकारच विफल ठरते आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते. तिबेटच्या स्वायत्ततेसाठी आवाज उठवणार्या दलाई लामा यांना भारतात आश्रय घ्यावा लागला, केवळ दोन दिवसांच्या अंतरावर आखाताशी संपर्क चीनने निर्माण केला, तेलाचा प्रचंड साठा केला गेला आहे. लष्कराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला आहे. काही लोकांना चीनशी चांगले संबंध ही एक सुवर्णसंधी वाटते आहे. अशा लोकांनी या घडणार्या घटनांकडे डोळसपणे पहावे व जागे व्हावे एवढेच सांगून थांबतो.Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-21092843679125382042010-12-19T06:46:00.000-08:002010-12-19T06:46:29.160-08:00भारताचे शत्रू कोण? : प्रारंभमित्रांनो, <br />
भारताची सध्याची सामाजिक,आर्थिक आणि राजकीय परिस्थिती अगदी कंगाल अवस्थेत आहे. मला वाटलेले, पटलेले, सुचलेले विचार तुमच्यापुढे मांडत आहे. माझी मते तुम्हाला पटतील न पटतील. पण या अतिशय संवेदनशील विषयावर काहितरी कृती होणे नक्की गरजेचे आहे. देश चहू बाजूंनी शत्रूंनी घेरला जात असताना, शत्रूच्या कारवाया उघड्या डोळ्यांना दिसत असताना, शत्रू प्रबळ होत असताना केवळ मला काय त्याचे ही बघ्याची भूमिका सध्याचे केंद्र सरकार घेत आहे हे उघड उघड दिसते आहे. सर्वसामान्य जनतेला कळते आहे. तरीही जनतेचा विश्वास जपण्यासाठी सरकार कडून कोणतीही हालचाल दिसत नाहीये. या चिंतनातून या लेखमालेचा उद्भव झाला असे म्हटले तरी चालेल.<br />
<br />
अनेक विषय आहेत. त्यांचा माझ्या कुवतीप्रमाणे परामर्श घेईनच. पण या विचारांत तुम्हा सर्व बुद्धीवंतांचे योगदान सकारात्मक चर्चेने सहभाग अपेक्षित आहे. या लेखमालेत मी ढोबळमानाने पुढील विषय हाताळेन.<br />
<br />
- चीनचे वाढते संकट<br />
- पाकिस्तान - चोराच्या उलट्या बोंबा<br />
- बांगलादेश - एक संधी की अडचण?<br />
- श्रीलंका - सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा - पण मित्र की शत्रू<br />
- नेपाळ - हळूहळू ड्रॅगनच्या पंज्याखाली<br />
- भारतातील संवेदनशील टापू<br />
- भारताचे संरक्षण धोरण (भू, वायू व आकाश)<br />
- भारताचे परराष्ट्र धोरण<br />
- काश्मीर एक अश्वत्थाम्याची जखम<br />
- कॉमनवेल्थ गेम्स<br />
- भ्रष्ट्राचार व राजकारण<br />
- रशिया निती<br />
- युरोपिय देशांशी संबंध<br />
- इंग्लंडचे महत्त्व<br />
<br />
असा सर्वसाधारण मनात आलेला विचार आहे. हळूहळू आम्ही त्यातील विषय वाढवूच.<br />
सुरुवातीला एवढा संक्षिप्त आलेख पुरेसा आहे.<br />
<br />
प्रारंभः<br />
भारताची फाळणी १९४७ साली झाली आणि लाखोंच्या संख्येने हिंदू आणि मुस्लिम धर्मातील लोक स्थलांतरीत झाले. याबाबतीत एक स्पष्टपणे नमूद करायचे आहे की भारताची फाळणी जी झाली ती मुख्य करुन मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र हवे या मागणीच्या पूर्ततेसाठी झाली होती. भारताच्या फाळणीमागे सूर्यप्रकाशाएवढे एवढे स्पष्ट उद्दिष्ट असतानाही महात्मा गांधींनी ज्या मुसलमानांना भारतात रहायचे आहे त्यांनी भारतात रहावे हा अट्टाहास का धरला होता याचे कारण त्यांनाच माहिती. पण देशाचे तुकडे करणे हे मुळात धर्मावर आधारित असताना ही खेळी म्हणजे गांधीजींची एक मोठी राजकीय चूकच म्हणावी लागेल. 'माझे सत्याचे प्रयोग' या आत्मकथनात डोकावले की कोणालाही लक्षात येईल की गांधीजींच्या प्रयोगांची केव्हढी मोठी किंमत हिंदुस्थानाला चुकवावी लागली आहे. धर्मावर आधारित विभागण्या त्याप्रमाणे झाल्या असत्या तर आज भारतात खरेच खूप शांती असती. किंवा आपल्यापुढचे विषय वेगळे असते. कोणत्याही क्षणी बॉम्बस्फोटांत मृत्यू, धार्मिक दंगे, असे केले तर मुसलमानांना काय वाटेल? असल्या टांगत्या तलवारीखाली जगावे लागले नसते.<br />
<br />
सध्या देशात एक प्रचंड संशयाचे वातावरण आहे. हिंदु मुसलमानाकडे साशंकपणे का होईना पण सद्भावनेने बघत जरी असला तरी मुसलमानांकडून तो भाव दिसत नाही. कारणे काही असोत. पण १,००० वर्षे हिंदूंवर राज्य केले असल्याच्या रम्य इतिहासाची स्वप्ने पुन्हा काही माथेफिरु इस्लामी नेत्यांना पडू लागली आहेत. अशा माथेफिरु मुस्लिमांना पुन्हा हिंदुंच्या मोठ्या प्रमाणावर कत्तली करायच्या आहेत, पुन्हा मंदिरे फोडून मशिदी उभारायच्या आहेत. पुन्हा हिंदूंच्या स्त्रियांना जबरदस्तीने भोगायचे आहे. त्यासाठी मिळेल त्या क्षेत्रांत दहशतीचे तंत्र सर्रासपणे ते वापरत आहेत. मग ते फिल्म इंडस्ट्री मध्ये मुस्लिम हिरोंचा दबदबा टिकवण्यासाठी असो, वा संगीत क्षेत्रांत पाकीस्तानी गायकांनाच चांगली गाणी मिळतील यासाठीचा कटाक्ष असो, लव जिहाद असो, ठीक ठीकाणी मशिदी उभारणे असो, धर्माच्या नावाखाली रस्त्यांवर नमाज पढणे असो. वा कोणते फतवे असोत. इस्लामी नेत्यांचे सर्वसामान्य मुस्लिम जनतेला केले जाणारे मार्गदर्शन हे धर्मांधतेचे लक्षण आहे. या धर्मांध स्वप्नाचे पडसाद आपल्या आजूबाजूला उमटत आहेत. पण आपण डोळे झाकून बसलो तर आपल्या घराची आहुति त्यात पडल्याशिवाय राहणार नाही. <br />
<br />
लव्ह जिहाद ही काही केवळ कपोल कल्पित कल्पना आहे असे मला तरी वाटत नाही. समाजात कित्येक उदाहरणे आहेत. कोण त्यांतून शहाणे झाले कोण फसले हा वेगळा विषय आहे. पण समाजाच्या सर्वच थरांतून हिंदू मुलींना मुसलमान मुले आवडण्याचे प्रमाण अचानक कधी नव्हे तेवढे वाढू लागले आहे. प्राचीन धर्मग्रंथांत म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखादा समाज भ्रष्ट होतो तेव्हा आधी त्या समाजाचा धर्म भ्रष्ट होतो, जेव्हा धर्म भ्रष्ट होतो तेव्हा आधी त्या समाजातील स्त्रीयांचे शील भ्रष्ट होते, ही सुरुवात थोपवता आली नाही तर समाजाचे अधःपतन निश्चित आहे. हिंदू स्त्रियांनी वैयक्तीक विचार करण्याची देखील खूप गरज आहे. मुख्य म्हणजे आजच्या स्त्रिया सुशिक्षित आहेत स्वतंत्र प्रज्ञेच्या धनी आहेत. प्रेमाला कोणत्याही मर्यादा नसतात हे मान्य पण आपण काय करतो आहोत याचा थोडा विचार केला तरी त्यातील फोलपणा त्यांच्या लक्षात येईन. समाजात आता त्याची मोठ्या प्रमाणावर उदाहरणे यायला सुरुवात झाली आहेत<br />
<br />
सैफ अली खान ने करिना कपूर साठी अमृता सिंग ला सोडले ( २ मुले झाली असूनही)<br />
मोहम्मद अझरुद्दीन ने संगीता बिजलानीला ज्वाला गुट्टा साठी सोडले (त्यांनाही मुले आहेत) (ज्वाला गुट्टाने चेतन आनंदला सोडले)<br />
अरबाज खानची बायको मलाईका अरोरा<br />
अमृता अरोरा चा नवरा शकील लडाक<br />
सलमान रश्दीची बायको पद्मा<br />
शाहरुख खानची बायको गौरी<br />
<br />
हीच स्टोरी टीव्ही सिरियल्स मधून कामे करणार्या कलाकारांमध्येदेखील दिसते.<br />
अदनान सामी राणी मुखर्जीच्या मागे होता (शेवटच्या क्षणी फिसकटलेली गोष्ट)<br />
सलमान खान ऐश्वर्या राय च्या मागे होता. (ही कहाणीपण ऐन वेळी फिसकटलेली)<br />
<br />
हिंदू पुरुष आणि मुसलमान स्त्री अशा जोड्या समाजातील सर्वच थरांत किती दिसतात? बघा थोडा विचार करा.<br />
मला कट्टर हिंदूत्व आणि कट्टर इस्लाम या वादांत नाही पडायचय. पण समाजात आपल्यासमोर काय चाललं आहे हे दाखवून द्यायचा हा प्रयत्न आहे. वरील उदाहरणे फक्त ग्लॅमर विश्वातील आहेत. पण अनेक ख्यातनाम कंपन्यांत मोठ्या पदांवर असलेल्या स्त्रियांचे नवरे मुस्लिम आहेत. अथवा मुस्लिम पुरुषांच्या बायका हिंदू आहेत. तुम्ही रहात असलेल्या छोट्या मोठ्या मोहल्ल्यातील एखादी तरुण मुलगी गायब होते व मुसलमान बॉयफ्रेंड बरोबर लग्न करुन प्रकट होते. या कायद्याच्या चौकटीत घडत असलेल्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्यांची तीव्रता आपल्याला जाणवत नसेन तर येणारा काळ कठीण आहे एवढे नक्की सांगता येईल.<br />
<br />
हा उदारपणा (गांधीजीच्या भाषेतील सर्वधर्मसमभाव) फक्त हिंदूंच्याच स्त्रिया का दाखवतात? क्षणिक सुख आज आपल्या जीवनात एवढे मोठे झाले आहे? की एक सामाजिक जबाबदारी पण आपण नाकारतो आहोत? समाजाने अंतर्मुख होण्याची गरज आहे. हिंदूंच्या स्त्रियांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने अंतर्मुख होण्याची गरज आहे.<br />
<br />
थोडेसे आत्मपरिक्षण आपल्याला आत्मग्लानीतून बाहेर आणू शकेल. बघा विचार करा आणि समाज वाचवा.<br />
लिहिण्यासारखे भरपूर आहे. पण अजून खूप ज्वलंत प्रश्न आहेत.<br />
तूर्तास इथेच थांबतो. पुढची भेट पुढच्या लेखात. चीन बद्दल....Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-90566370401020933002010-03-19T10:52:00.001-07:002010-03-19T10:52:15.019-07:00मराठी नवीन वर्षाच्या (सन १९३२) च्या हार्दीक शुभेच्छामराठी नवीन वर्षाच्या (सन १९३२) च्या हार्दीक शुभेच्छाUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-90048853015432940062010-01-19T23:27:00.000-08:002010-01-19T23:31:07.261-08:00गोल्डनबॉय बिंद्राने खेळ सोडून द्यावा<span style="font-family: CDAC-GISTYogesh, Verdana, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 17px; white-space: pre-wrap;"><b>वैतागून खेळाडूंनी क्रिडा क्षेत्राला रामराम ठोकणे काही नवीन नाही... </b></span><br />
<span style="font-family: CDAC-GISTYogesh, Verdana, Arial, Helvetica, sans-serif; font-size: 17px; white-space: pre-wrap;"><b>धनराज पिल्ले सारखा गुणी खेळाडू ज्याला ध्यानचंद नंतरचा तारा समजले जायचे, त्याला पण हॉकी च्या पदाधिकार्यांच्या गलिच्छ राजकारणाने सडवले आणि निवृत्त होण्यास भाग पाडले.... </b></span><br />
<br />
<span style="font-family: CDAC-GISTYogesh, Verdana, Arial, Helvetica, sans-serif; font-size: large;"><span style="font-size: 17px; white-space: pre-wrap;"><b>बिंद्राच्या बाबतीत जे झाले त्यासाठी लालफितीचे तानाशाही अधिकारी जास्त जबाबदार आहेत. अनुशासन कोणाला शिकवतात हे? जिथे सरकारला कोणतेही अनुशासन नाही. मनमानी कारभार करते तिथे क्रिडा क्षेत्रात ही घाण पसरली तर नवल ते कसले? पाणी नेहमी वरुन खाली वाहते... </b></span></span><br />
<span style="font-family: CDAC-GISTYogesh, Verdana, Arial, Helvetica, sans-serif; font-size: large;"><span class="Apple-style-span" style="font-size: 17px; white-space: pre-wrap;"><b><br />
</b></span></span><br />
<span style="font-family: CDAC-GISTYogesh, Verdana, Arial, Helvetica, sans-serif; font-size: large;"><span style="font-size: 17px; white-space: pre-wrap;"><b>ऑलंपिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूशी असे वर्तन करणार्या या भ्रष्ट पदाधिकार्यांनी स्वत: नेमबाजीसाठी कधी बंदूक हातात धरली असेन का? फक्त आणि फक्त पैसा खाणे हेच ज्यांना माहित आहे त्यांनी साधी या गोष्टीची पण सोय केली नाही की खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा प्रशिक्षणासाठी उपलब्ध करुन द्याव्यात. कशाला आपले खेळाडू परदेशी जातील मग? इथे सुविधा देण्याच्या नावाने बोंब आणि मग परदेशी खेळाडू स्वतःच्या खर्चाने गेले तरी पोटात दुखते यांच्या... </b></span></span><br />
<span style="font-family: CDAC-GISTYogesh, Verdana, Arial, Helvetica, sans-serif; font-size: large;"><span class="Apple-style-span" style="font-size: 17px; white-space: pre-wrap;"><b><br />
</b></span></span><br />
<span style="font-family: CDAC-GISTYogesh, Verdana, Arial, Helvetica, sans-serif; font-size: large;"><span style="font-size: 17px; white-space: pre-wrap;"><b>हॉकीची टीम पण म्हणाली होती की आम्ही आमच्या पैशाने वर्ल्ड कप खेळू. यातच क्रिडा क्षेत्राच्या भ्रष्ट्राचाराचा बुडबुडा फुटतो. पण सरकारी मंत्रीच नव्हे तर खुद्द पंतप्रधान देखील मांजरासारखे डोळे बंद करुन बसतात. मुळात दर्जा निर्माण करण्याबद्दल शासकीय यंत्रणाच झोपलेली आहे तर खेळाडूंनी किंवा सर्वसामान्यांनीही काय करावे? </b></span></span><br />
<span style="font-family: CDAC-GISTYogesh, Verdana, Arial, Helvetica, sans-serif; font-size: large;"><span class="Apple-style-span" style="font-size: 17px; white-space: pre-wrap;"><br />
</span></span><br />
<span style="font-family: CDAC-GISTYogesh, Verdana, Arial, Helvetica, sans-serif; font-size: large;"><span style="font-size: 17px; white-space: pre-wrap;"><b>सर्व खेळाडूंना मोलाचा सल्ला : </b><b>हा देश दर्जेदार खेळाडूंसाठी नाहिये. फक्त वशिला आणि मोठ्या नेत्याचा पाठींबा असणार्या खेळाडूंसाठीच आहे. तेव्हा खेळ सोडा आणि आपले पोटापाण्याचे उद्योग बघा ... किंवा पैसे असतील तर विदेशात जा. तिथे तुमची कदर होईन....</b></span></span><br />
<span style="font-family: CDAC-GISTYogesh, Verdana, Arial, Helvetica, sans-serif; font-size: large;"><span class="Apple-style-span" style="font-size: 17px; white-space: pre-wrap;"><br />
</span></span><br />
<span style="font-family: CDAC-GISTYogesh, Verdana, Arial, Helvetica, sans-serif; font-size: large;"><span style="font-size: 17px; white-space: pre-wrap;"><span class="Apple-style-span" style="color: #454545; font-size: 18px; white-space: normal;">(क्रिडा क्षेत्राच्या नासाडीने खिन्न झालेला) सागर</span></span></span>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-25215380977911784802010-01-07T23:49:00.000-08:002010-01-07T23:49:45.947-08:00नवीन वर्ष २०१०इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सन २०१० हे नवीन वर्ष सुरु होऊन आज ७ दिवस झालेत.<br />
नवीन वर्षाची सुरुवात ही खरेतर सर्व जण नवीन संकल्प करण्यासाठी वापरतात.<br />
मी पण काहीतरी ठरवले आहे. भरपूर लेखन करायचे हा त्यातील एक संकल्प.<br />
जनसामान्यांचे विचार या ब्लॉगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.<br />
<br />
*** सध्यातरी २०१० या नवीन वर्षाच्या सर्व वाचकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा ***<br />
जय हिंद!!! जय महाराष्ट्र!!!<br />
- सागरUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-73249666142262112052009-10-08T10:26:00.000-07:002009-10-08T11:01:03.515-07:00महाराष्ट्राचे भवितव्य : १३ ऑक्टॉबर २००९ : विधानसभा निवडणूकBLOG: http://soneripahat.blogspot.com/ <br />येत्या १३ ऑक्टोबर २००९ ला महाराष्ट्राचे भवितव्य मतपेटीत बंद होईन. पण त्या अगोदर आपले मत योग्य पक्षाला दिले जाते आहे की नाही हे बघणे प्रत्येक जागरुक मतदाराचे पहिले कर्तव्य आहे. आजची तरुण , मध्यमवयीन आणि वृद्ध पीढी मतदानाचा दिवस हा सुट्टीचा वा स्वत:ची कामे करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात मग्न राहतात. आपण मतदानाच्या दिवशी काय करतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:लाच विचारायला हवा. आपण स्वत: खूप गंभीर होणे खूप आवश्यक आहे. सर्व जगात लोकशाही प्रभावीपणे टिकवणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. लोकशाही पद्धतीने मतदान होते हे खरे आहे. पण योग्य उमेदवार लोक निवडून देतात का? हा खरा चिंतेचा विषय आहे. <br /><br />मत देऊ शकणार्या प्रत्येकाने मत देण्यापूर्वी आपल्याला अन्न , वस्त्र आणि निवारा ह्या जगण्यासाटी आवश्यक मूलभूत गरजा स्रहजपणे उपलब्ध आहेत का? जर ह्या मूलभूत गरजांसाठी चैन म्हणून झगडावे लागत असेन तर स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनीदेखील सर्वसामान्य व्यक्तीची अवस्था अशी का? हा खरेच खूप मोठा गंभीर प्रश्न आहे.<br />आता उदाहरणच द्यायचे झाले तर सर्वसामान्यांच्या आवाक्यात २-३ वर्षांपूर्वी असणारे जमीन आणि फ़्लॅट्स चे भाव आकाशाला जाऊन भिडले आहेत. आर्थिक मंदी आली तेव्हा ह्या मुजोर बिल्डर लॉबीने जेवढ्या तेजीने भाव वाढवले तसे खाली न आणता स्थिर ठेवून पुन्हा वाढवत आहेत. ह्या सर्व भांडवलदारांवर कोणीतरी अंकुश ठेवणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत हे काम फ़क्त राज ठाकरे प्रभावीपणे करताना दिसत आहेत. सत्तेत असणा~र्या व विरोधी पक्षात असणार्र्या प्रमुख पक्षांनी हे काम करणे हे त्यांचे कर्तव्य होते. पण कोणीच त्याकडे लक्ष दिले नाही. मराठी माणसाला सगळे गृहीत धरतात आणि मराठी माणूस हे पहात बसण्यशिवाय काही करु शकत नाही.<br /><br />सध्याच्या परिस्थितीत मला तरी राज ठाकरे यांना संधी देण्याचा योग्य पर्याय दिसत आहे. असे का? हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होणे साहजिक आहे. आपण काही कारणे पाहूया मग तुम्ही स्वत: ठरवा योग्य नि अयोग्य...<br />राज ठाकरेंना पाठींबा देण्याची गरज आहे असे मला तरी वाटते आहे. यातून दोन संध्या मला तरी दिसत आहेत.<br />अ. राज ठाकरेंना संधी दिली तर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांना काम करुन दाखवावे लागेल - आणि<br />ब. कॉंग्रेस , राष्ट्रवादी, सेना , भाजपा व इतर पक्षांना लोकांसाठी खर्र्या अर्थाने कामे करावी लागतील<br />म्हणजे झाला तर मराठी माणसाचाच फ़ायदा आहे. आणि अशी सुवर्णसंधी मराठी माणसाने गमावू नये असे मला वाटते. आणि मनसे नावाच्या वादळाने कामे नाही केली तर ५ वर्षांनी काय करायचे ते तुमच्या मतदार राजाच्याच हातात आहे की. ६० वर्षांच्या मानहानीच्या तुलनेत ५ वर्षे अपेक्षांची काय वाईट?<br /><br />१. मला संधी द्या ... आधी जे कधी घडले नव्हते ते घडवून दाखवीन. आणि यात अपेशी ठरलो तर पुन्हा तुमच्या दारात मत मागायला येणार नाही. - असे आजपर्यंत गेल्या ६०-६२ वर्षांत एक तरी नेता म्हणाला होता का हो?<br /><br />२. नितिन गडकरीं हे विरोधी पक्षातील असूनही त्यांना रिझल्ट देणारा माणूस म्हणून त्यांच्या कामांची उदाहरणे देऊन कौतुक करणे हे आजपर्यंत कोणा राजकीय नेत्याने केले होत का हो?<br /><br />३. जेट ऐअरवेज... करण जोहर चा चित्रपट... मराठी पाट्या .... रेल्वेत फ़क्त उत्तरभारतीयांच्या भरतीच्या विरोधातील आंदोलने... हे राज ठाकरे यांनी दिलेले रिझल्ट्स आहेत. सरकार सत्तेवर असून या प्रश्नांना न्याय देऊ शकले नव्हते.<br />तेच काम राज ठाकरे यांनी सत्तेत नसताना करुन दाखवले हे विशेष. राज ठाकरेंना सत्तेची चावी हातात दिली तर कामे किती प्रभावी पद्धतीने होतील?<br /><br />मराठी माणसाने आता स्वत:बद्दल विचार करण्याची वेळ आली आहे . आपण दुसर्र्या राज्यांमधे जातो तेव्हा हिंदी चालते का? आपल्या शेजारचीच राज्ये घ्या ना... गुजरात, आंध्र, कर्नाटक, केरळ... <br /><br />आपले बहुमोल मत देण्यापूर्वी मराठी माणसांपुढे उभे असणारे प्रश्न विचारात घेऊन मतदान करावे अशी माझी विनंती आहे.<br /><br />१. घराचे स्वप्न साकार होते आहे का?<br />२. सकस अन्न पोटभर मिळते का? (रेशनच्या निकृष्ट दर्जाच्या तांदूळावर-धान्यावर मराठी माणसाने जगायचे का?)<br />३. मराठी मुला-मुलींना रोजगाराच्या संधी सहजपणे मिळतात का?<br />४. दुकानात खरेदीसाठी जातात तेव्हा मराठी ग्राहक म्हणून आदर मिळतो का?<br />५. उद्योगधंदे करण्याबाबत मराठी तरुणांना सरकारी प्रोत्साहन प्रत्यक्ष मिळते का?<br />६. मराठी संस्कृती, मराठी भाषा यांचा सन्मान आपल्याच महाराष्ट्रात होतो का?<br /><br />विचार करा आणि मत द्या<br />जय महाराष्ट्र<br />सागरUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-46906759788158890172009-08-20T01:44:00.000-07:002009-08-20T01:54:54.893-07:00जसवंतसिंहाना भाजपाने बरखास्त का केले?जसवंतसिंहाना भाजपाने बरखास्त का केले? हा मोठा प्रश्न असेन भाजपात काम केलेल्या सर्वांसाठी आणि भाजपा समर्थक सर्वच मतदारांच्या मनात. <br /><br />पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी भाजपा आणि जसवंतसिंह यांच्या मित्रवर्यांमध्ये हे पुस्तक अगोदरच वितरित झालेले होते. तसे बहुतेक सर्व पुस्तकांच्या बाबतीत होत असते ....अभिप्रायासाठी... आडवाणी हे देखील पट्टीचे वाचक असल्यामुळे त्यांनी पुस्तक वाचले असेनच आणि त्यांची जसवंतसिंहांना बरखास्त करण्या मागे निर्णायक भूमिका असल्याचे तर्क हिंदी पत्रकार व्यक्त करत आहेत. (मी बंगळूरात राजस्थान पत्रिका वाचतो. त्यात आजच्याच अंकात यावर लेख आला आहे.) <br /><br />खरेखोटे देवच जाणे..<br /><br />पण जसवंतसिंहांच्या पुस्तकामुळे 'जीनांमुळे' पाकीस्तानची निर्मिती झाली हे सत्य खोटे ठरु शकत नाही. भारताच्या फाळणीचा सखोल अभ्यास करुन विदेशी लेखकांनी लिहिलेल्या सुप्रसिद्ध 'फ्रीडम अॅट मिडनाईट' या पुस्तकातही हेच सांगितले गेले आहे. या पुस्तकावर तर पाकीस्तानात बंदी आहे. त्यात जीनांविषयी अनेक सत्य बाबी लिहिलेल्या आहेत. जीज्ञासूंनी हे पुस्तक अवश्य वाचावे. <br /><br />माझे स्वत:चे मत विचाराल तर गांधीजींच्या अहिंसेमुळे आपल्या भारत देशाची जेवढी हिंसा झाली आहे तेवढी जगाच्या इतिहासात कोठेही झालेली नाही. हिंसक अन्यायाविरुद्ध हिंसक प्रतिकार हेच एकमेव शस्त्र ठरते. जगाच्या इतिहासात डोकावून पाहिले तर सगळीकडे एकच चित्र दिसते की हिंसक अत्याचाराला हिंसेनेच प्रत्युत्तर दिले तरच अन्यायाविरुद्ध जिंकता येते. ग्यारिबाल्डीने काय केले? ... जोसेफ़ मॆझिनि ने काय केले? .... स्वातंत्र्याचा लढा हिंसेनेच लढले ना?<br />हिटलर... नेपोलियन या हुकुमशहांना सत्ता कशी मिळाली? हिंसेच्या माध्यमातूनच ना? ... हिटलर ला नेस्तनाबूत कसे केले गेले? ... युद्धानेच ना?... <br /><br />जो पर्यंत समस्त भारतवासी गांधीजींच्या किडलेल्या आणि सडलेल्या तत्त्वांना घट्ट जळवासारखे पकडून बसलेल्या कॊंग्रेसचे आंधळे अनुकरण करतील तर येत्या काही दशकांत भारत या नावाचा देश आणि हिंदू नावाचा महान धर्म नष्ट झालेला असेन. <br />जाज्ज्वल्य देशभक्ती जागवण्यासाठी प्रखर भूमिका घेणे खूप आवश्यक आहे समस्त भारतवासियांनो.... एकदाच किंमत मोजावी लागेल पण आपल्या पुढच्या १००० पिढ्या सुखाने जगतील... तेव्हा नष्ट होऊन इतिहासाचे जीर्ण पान व्हायचे का इतिहास हादरवून सोडायचा ते तुमचे तुम्ही ठरवा.. जय हिंद<br /><br />विषयांतर होतंय... मुद्याकडे परत वळतो... तर जसवंतसिंहांना मिळालेली शि़क्षा ही योग्य आहे असे माझे मत आहे. <br />अशा सडक्या मनोवृत्तींना त्यांची जागा दाखवून देणे खूप आवश्यक आहे. भाजपाने जसवंतसिंहांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली आहे.<br /><br />जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!<br />(पूर्वीच्याच अखंड भारताचे स्वप्न पाहणारा) सागरUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-80662981131989402572009-05-07T07:13:00.000-07:002009-05-07T07:18:58.765-07:00अजून किती सहन करणार काँग्रेसला?एक मोठे काम सांगू का भाजपाने केलेले?<br /><br />गरिबांचे आशिर्वाद तरी मिळवले होते त्यांनी<br />जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवले होते भाजपाच्या सरकारने.<br />त्यासाठी काय काय उठाठेवी केल्या ते त्यांचे त्यांना माहीत...<br /><br />पण गरिबांना ५ वर्षे एकाच दराने स्वस्त अन्न धान्य उपलब्ध करुन दिले होते...<br />गरिबांच्या पोटाचा विचार किमान या सरकार ने केला तरी होता...<br /><br /><br />काँग्रेस राजवटीत तीच महागाई किती आसमानात भिडली आहे हे सगळ्यांना माहीत आहे<br />वीज<br />पाणी<br />पेट्रोल<br />२०-२२ रुपयाला मिळणारा तांदूळ ४०-६० रुपयांना मिळतोय<br />डाळींचेही तेच<br />साखर<br />दूध<br />गहू<br />बाजरी<br /><br />सर्व्हिस टॅक्स वाढवला<br />व्हॅट सुरु केला<br /><br />सगळ्यां जीवनावश्यक वस्तूंचे भाव तुम्ही पहा.<br />तुमचे तुम्हालाच कळेल सर्वसामान्य माणसाला काय भोगावे लागते आहे ते....<br />गरिबीरेषेखाली जगणारे व मध्यमवर्गीय या वर्गात मोडणारे जे आहेत ते सर्व देशाच्या बहुसंख्य लोकांमधे येतात. ९०% पेक्षा जास्त<br /><br />तुम्हीच बोला ... सर्वसामान्य माणसाने काय करावे?<br /><br />सामान्य माणसांना अणुकरार.... विदेश दौरे या गोष्टी नाही कळत हो.... त्याला फक्त पोटाला बसणारा चिमटा कळतो....<br />मन मारणे कळते....<br /><br />काँग्रेसने इमानेइतबारे सर्वसामान्यांसाठी काम करायचे ठरवले असते तर खरेच ५-१० वर्षे पुरेशी आहेत देशाचा कायापालट करायला.<br />पण सर्वात जास्त स्विस बँकेत बॅलन्स फुगवण्यात काँग्रेसी नेते आघाडीवर आहेत हे सत्य नाकारता येणार नाही... यामुळेच तर सध्याचे सरकार काळया पैशावर मौन साधून आहे आणि कोणतीही कार्यवाही करत नाहीये. चोरच कसा सांगेन ही आपली चोरी आहे म्हणून :)<br />आडवाणींनी राजकारणासाठी हा मुद्दा उपस्थित केला असे मान्य केले तरी सत्य नाकारता येत नाही....<br /><br />अरे लेको आपल्याच कष्टाचे पैसे विदेशात पडले आहेत आणि आपण त्याच चोरांना योग्य उमेदवार म्हणून निवडून देतो याचा आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे....<br /><br />एकालाच संधी किती वर्षे देणार? झाली की ५० वर्षे... दुसर्या पक्षांना संधी नाही मिळाली तर त्यांना अनुभव कधी येणार?<br /><br />आपण सर्व मतदार लाचारीने एकच पर्याय कायम निवडत आलेलो आहोत... दुसरी अनुभवाची फळी तयार करणे हे सुज्ञ मतदार म्हणून आपले कर्तव्य नाही काय?<br />दिसला पंजा की मार शिक्का... विचार न करता???<br />पहा विचार करुन माझे विचार पटले तर....<br /><br />जय हिंद जय महाराष्ट्र<br />- सागर<br />अवांतरः स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करुन टाका अशी स्वतः गांधीजींची इच्छा होती म्हणे... पण नेहरु प्रभृतींनी विरोध केला आणि सत्तेत सहभागी होण्याच्या लालसेने काँग्रेस जिवंत ठेवली... आता सत्तालोलुप कोण? हे ज्याचे त्याने ठरवावे....Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-49649569095299247962009-04-01T02:11:00.000-07:002009-04-01T02:31:49.480-07:00मतांची लाचारी किती दिवस??? शो-टाईम नाऊ<span class="Apple-style-span" style="font-family:CDAC-GISTYogesh;"><span class="Apple-style-span" style="border-collapse: collapse; white-space: pre-wrap;"><span class="Apple-style-span" style="font-size: 13px; ">अंजली बाईंचे प्रेस ला दिलेले वक्तव्य ऐकले आहे मी. त्यांचे म्हणणे आहे की माझी भूमिका माझ्या विरोधकांना समजायला जरा वेळ लागेल.</span></span></span><div><span class="Apple-style-span" style="font-family:CDAC-GISTYogesh;"><span class="Apple-style-span" style="border-collapse: collapse; white-space: pre-wrap;"><span class="Apple-style-span" style="font-size: 13px; "><br /></span></span></span></div><div><span class="Apple-style-span" style="font-family:CDAC-GISTYogesh;"><span class="Apple-style-span" style="border-collapse: collapse; white-space: pre-wrap;"><span class="Apple-style-span" style="font-size: 13px; ">कदाचित कसाब चा वकील होऊन त्याच्यावरील आरोप कायद्याने सिद्ध करण्यात कोर्टाला मदत करणे हा त्यांचा हेतू असू शकेल. तसे असेल तर ती एक प्रकारची देशभक्ती नाही का? <br /></span></span></span></div><div><span class="Apple-style-span" style="font-family:CDAC-GISTYogesh;"><span class="Apple-style-span" style="border-collapse: collapse; white-space: pre-wrap;"><span class="Apple-style-span" style="font-size: 13px; ">नाहीतर कोणी वकील मिळत नसल्यामुळे कसाबदेखील अफजल गुरुसारखा आपल्या देशात जेलमधे आरामात जीवन जगेन.... मग परत कोणतेतरी विमान हायजॅक होईन किंवा कोणास ओलिस धरून अफ्जल आणि कसाबला सोडावे लागेल... 'वेडनस्डे' चित्रपटातील एक वाक्य आठवते.... एक आदमी मुजरीम है के नही ये साबित करने के लिये आपको १० साल लगते है| आपको नही लगता की ये आपकी काबिलियत पे सवाल है? ह्यातून सरकारी नोकरशाहांनी बोध घेण्याची गरज आहे. नाहीतर मुंबई, अहमदाबाद, दिल्ली अशा ठिकाणी झालेल्या बाँम्ब्स्फोटांची संख्या अजून शेकड्यांनी वाढेन आणि लवकरच तालुका ठिकाणीदेखील अशा घटना सातत्याने घडू लागतील. मालेगांव बाँब्स्फ्स्फोट हे उत्तम उदाहरण आहे. </span></span></span></div><div><span class="Apple-style-span" style="font-family:CDAC-GISTYogesh;font-size:100%;"><span class="Apple-style-span" style="border-collapse: collapse; font-size: 13px; white-space: pre-wrap;"><br /></span></span></div><div><span class="Apple-style-span" style="font-family:CDAC-GISTYogesh;"><span class="Apple-style-span" style="border-collapse: collapse; white-space: pre-wrap;"><span class="Apple-style-span" style="font-size: 13px; "> सर्वसामान्यांच्या आयुष्याची खात्री देण्यात सध्याचे राज्य आणि केंद्र सरकार दोघेही अतिशय नालायक ठरले आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते,...येत्या निवडणूकीत काँग्रेसला आंधळेपणाने मते देणार्या मतदारांना एक लक्षात आणून देऊ इच्छितो की त्यांची मते चुकीच्या आणि अपात्र लोकांना सत्तेवर आणतात. आणि अशा चुकांची फळे याच मतदारांना भोगावी लागतात ही गोष्ट मात्र सर्वच विसरतात.</span></span></span></div><div><span class="Apple-style-span" style="font-family:CDAC-GISTYogesh;"><span class="Apple-style-span" style="border-collapse: collapse; white-space: pre-wrap;"><span class="Apple-style-span" style="font-size: 13px; "> मी असे नाही म्हणत की भाजप , शिवसेना वा अन्य कोणी पक्ष ही परिस्थिती एका रात्रीत बदलू शकेन. पण ६० वर्षे एकाच पक्षाला वेळोवेळी संधी देऊन काय साध्य झाले? पण ६० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा काँग्रेस पक्षाने देशाला लाभ करुन देण्यापेक्षा स्विस बँकेतील आपली खाती फुगविण्याकडे जास्त लक्ष पुरविले.... परिणामी देशावर कर्जांचा डोंगर साचला. याचाच परिणाम म्हणून आज आपण सगळे १० % सर्व्हिस टॅक्स , १० - ३०% इन्कम टॅक्स देतो.... आपल्याच खिशातील पैसे सत्तेवरचे नेते स्वत:च्या खिशात भरत आहेत आणि सर्वसामान्य जनता मूकपणे बघत बसली आहे. आपल्या देशावर कर्ज नसेन तर आपल्या खिशातील पैसा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कापला जाणार नाही. तोच पैसा सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी अधिक कार्यक्षमतेने वापरला जाईन.इंदिरा गांधी आणि राजीव गांधी ह्यांचे योगदान जे आहे ते वैयक्तिक आहे. यात इतर काँग्रेसी नेत्यांचा काही हात आहे असे मला अजिबात नाही वाटत. मग इतर पक्षांना संधी देणे हे सुजाण नागरीक म्हणून आपले कर्तव्य नाही का? बघा थोडासा विचार करुन. तुमचे तुम्हालाच पटेल.</span></span></span></div><div><span class="Apple-style-span" style="font-family:CDAC-GISTYogesh;"><span class="Apple-style-span" style="border-collapse: collapse; white-space: pre-wrap;"><span class="Apple-style-span" style="font-size: 13px; "> अन्यायाविरुद्ध रक्त पेटून उठणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण सर्वजण ठेवतो. पण स्वतःच्या बांधवांशीच लढण्यात हे सगळे शौर्य वाया घालवतो. मग यु.पी.-बिहारी लोक रिक्षा, टॅक्सी , मजुरी अशा अनेक क्षेत्रांवर डेरा टाकून बसलेले असतात आणि आपले मराठी लोक इथेही मागे राहतात. </span></span></span></div><div><span class="Apple-style-span" style="font-family:CDAC-GISTYogesh;font-size:100%;"><span class="Apple-style-span" style="border-collapse: collapse; font-size: 13px; white-space: pre-wrap;"><br /></span></span></div><div><span class="Apple-style-span" style="font-family:CDAC-GISTYogesh;"><span class="Apple-style-span" style="border-collapse: collapse; white-space: pre-wrap;"><span class="Apple-style-span" style="font-size: 13px; ">बांगलादेशींच्या मुंबई व सगळ्या महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने झोपड्या उभ्या रहात आहेत. मतांच्या लाचारीसाठी या बांगलादेशींना भारतीय नागरिकत्वासाठी आवश्यक कागदपत्रे अल्पशा मोबदल्यात खिरापतीसारखी वाटली जात आहेत. लोकहो अशा गोष्टींकडे 'मला काय त्त्याचे' म्हणून दुर्लक्ष केलेत तर आपल्याच महाराष्ट्रात आपणच परके होऊ. संततीनियमन कायदा फक्त एकाच धर्मासाठी लागू का होतो? साधे गणित आहे मित्रांनो, मतांची लाचारी नाही का वाढत? ते ही राजरोस... धार्मिक यात्रांची निमित्ते करुन करोडो रुपयांचे अनुदान खिरापतीसारखे वाटले जाते. हा कसला सर्वधर्मसमभाव? अमरनाथ यात्रेसाठी वा मानस सरोवर यात्रेसाठी मिळते का सरकारी अनुदान? </span></span></span></div><div><span class="Apple-style-span" style="font-family:CDAC-GISTYogesh;"><span class="Apple-style-span" style="border-collapse: collapse; white-space: pre-wrap;"><span class="Apple-style-span" style="font-size: 13px; "> मराठी मतांची ताकद किती आहे हे दाखवून देण्याची ही निवडणूक खरेच खूप मोठी संधी आहे. आपण एक समाजमन म्हणून विचार न करता मते देतो. आपण स्वतःच आपल्या अधिकारांच्या बाबतीत अंधारात राहतो आणि मते देतो...<br /></span></span></span></div><div><span class="Apple-style-span" style="font-family:CDAC-GISTYogesh;"><span class="Apple-style-span" style="border-collapse: collapse; white-space: pre-wrap;"><span class="Apple-style-span" style="font-size: 13px; "> महाराष्ट्राच्या विकासाच्या, महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या , महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गोष्टी करणार्या पक्षालाच (उमेदवाराला नव्हे) मत दिले पाहिजे असे मला वाटते. बाकी सुज्ञ मतदार जागा होतो की नाही हे येणारा काळच सांगेन.</span></span></span></div><div><span class="Apple-style-span" style="font-family:CDAC-GISTYogesh;"><span class="Apple-style-span" style="border-collapse: collapse; white-space: pre-wrap;"><span class="Apple-style-span" style="font-size: 13px; "> मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता वा समर्थक नाही. पण माझे यावेळचे मत राज ठाकरे यांच्या 'मनसे' लाच. बरेच लोक म्हणतात राज ठाकरे यांचा मार्ग गुंडगिरीचा आणि जबरदस्तीचा वाटतो. मला सांगा मराठी लोकांना 'मनसे' ने कधी त्रास दिला? उलट मराठी लोकांसठी , मराठी लोकांना नोकर्यांत प्राधान्य मिळावे यासाठीच भांडतात ना ते? इथेही मला 'वेडनस्डे' चित्रपटातील वाक्य आठवते.... मै रास्ते के बारे मे नही नतीजों के बारे में सोचता हूं| :)<br /></span></span></span></div><div><span class="Apple-style-span" style="font-family:CDAC-GISTYogesh;"><span class="Apple-style-span" style="border-collapse: collapse; white-space: pre-wrap;"><span class="Apple-style-span" style="font-size: 13px; "> जयहिंद !!! जय महाराष्ट्र !!! (देशभक्त आणि महाराष्ट्रभक्त) सागर </span></span></span></div>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-1715156272009544982008-11-26T22:26:00.000-08:002008-11-26T22:28:37.151-08:00अतिरेक्यांच्या एका गोळीला हजार गोळ्यांनी उत्तर दिले पाहिजे.<p><span style="font-size:130%;">गुरू, 11/27/2008 </span></p><p><span style="font-size:130%;">काल पासून मी सर्व वृत्त वाहिन्यांवर पहात आहे. जे पाहिले ते सगळे सुन्न करुन टाकणारे आहे. अतिरेक्यांच्या एका गोळीला हजार गोळ्यांनी उत्तर दिले पाहिजे.</span></p><p><span style="font-size:130%;">अनेक प्रश्न उपस्थित राहतात</span></p><p><span style="font-size:130%;">१.आलेले अतिरेकी सगळे गुजरात मधून मुंबईला थेट गेट वे ऑफ इंडिया मधून आले आणि सगळीकडे पसरले अशी बातमी आहे न्यूज चॅनल्स ची.</span></p><p><span style="font-size:130%;"><strong>सागरी सीमा सुरक्षा दले काय झोपा काढत होती का? </strong>की पैसे खाऊन बोटी चेक न करण्याच्या विलासी शौक पायी कर्तव्याचा विसर पडला ?</span></p><p><span style="font-size:130%;">२.मुंबई पोलिस चा एक हवालदार गोळी लागलेला चॅनेलवर थेट प्रक्षेपण पाहिले. काय करावे त्याने? बिचार्याच्या हातात काठी होती. <strong>काठीने लढावे की काय त्याने एके-४७ बरोबर? </strong></span></p><p><span style="font-size:130%;">हा सरकारचा नाकर्तेपणा आहे की पोलिस स्वतःच्या कर्मचार्यांनाच सुरक्षा देऊ शकत नाही तर सामान्य जनतेला काय कप्पाळ देणार?मुंबईत राहणार्या आपल्या बांधवांचे आयुष्य एवढे स्वस्त आहे?सरकारने याचा जाब दिला तर पाहिजेच. पण एवढी वर्षे झोपा काढत होते की काय सरकार?</span></p><p><span style="font-size:130%;">ना सागरी सीमेवर लक्ष, ना भूसीमेकडे लक्षसगळे लक्ष आपले मतांच्या लाचारीकडे..... बांगला देशी लाखोंच्या संख्येने राजरोस भारतात सगळीकडे रोज पसरत आहेत आणि सरकार डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहे.<br />ज्यांची निष्ठा सीमेपार वाहिलेली आहे अशांना आपल्या देशाचे नागरिकत्व? अरे कुठे फेडतील हे पाप काँग्रेसवाले... नरकातही यांना जागा मिळणार नाही. त्यांच्यासाठी यमालाही खास नरक तयार करावा लागेल.</span></p><p><span style="font-size:130%;">राष्ट्रहित हे सगळ्या राजकारणापेक्षा पहिले आहे हे काँग्रेसच्या लक्षात का नाही येत?<br /></span></p><p><strong><span style="font-size:130%;">घडलेल्या घटनेचा जाहिर निषेध आणि मुंबईकरांचे अभिनंदन की अशा आतंकी कारवायांमधेही पळून न जाता एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून जखमींना मदत केली.<br />आणि इंग्लंड टीमचाही जाहीर निषेध की असल्या अतिरेकी हल्ल्याचे कारण काढून मोठ्या पराभवाची मानहानी टाळून मैदानातून पळ काढला...</span></strong></p><p><span style="font-size:130%;">(देशभक्त) सागर</span></p><span style="font-size:130%;"></span>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-2911494053769754872008-09-09T03:26:00.000-07:002008-09-09T03:38:54.993-07:00राज ठाकरे यांची घोषणा (वृत्त वाहिन्यांच्या भाषेत धमकी) आणि त्याचा परिणाम(सोम , 0८/09/2008 )<br />आयबीएन-लोकमत वर बातमी पाहीली. राज ठाकरे यांनी बच्चन कुटुंबियांचा एकही चित्रपट माफी मागेपर्यंत रिलिज होऊ न देण्याची घोषणा (वृत्त वाहिन्यांच्या भाषेत धमकी) केली आहे. कुत्सितपणे हसून मराठी भाषेची खिल्ली उडविणार्या जया बच्चन यांनी यु.पी. मधे जाऊन रहावे एवढे यु.पी. प्रेम ओतू चालले असेल तर..मुंबईने जे दिले ते यु.पी. देईन का ? मी हिंदी या राष्ट्रभाषेचा सन्मानच करतो... किंबहुना भारतात राहणार्या प्रत्येकाला राष्ट्रभाषा ही बोलता यायलाच हवी या मताचा मी आहे. आता मी इकडे कर्नाटकात गेली चार वर्षे रहात आहे. मी स्वतः कधी कन्नड भाषेची खिल्ली उडवणार नाही. मला स्थानिक भाषा येत नाही म्हणून मी असे कधीच म्हणणार नाही की मी महाराष्ट्राचा आहे, मी मराठीच बोलणार...इकडे दक्षिणेत असे चालणारच नाही. जया बाईंना हे माहीत नाही काय? मग मुंबईत राहून मराठी भाषेची कुत्सितपणे हसून चेष्टा करायची काय गरज होती त्यांना? हा मराठी माणसांच्या हृदयाचा मोठेपणा आहे की ते हिंदी बोलणार्याशी हिंदीतून बोलतात आणि मदत करतात. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक , आंध्र इकडे हिंदी शिकण्याची तसदीदेखील कोणी घेत नाही....<br />आपण तर राज ठाकरेंबरोबर आहोत... असा दणका दिल्याशिवाय त्या यु.पी. वाल्यांना कळतच नाही...<br /><a title="http://khabar.josh18.com/" href="http://khabar.josh18.com/">http://khabar.josh18.com/</a> येथे हिंदी वाहिन्यांची कारागिरी बघायला मिळेल...<br /><br />( मंगळ, 09/09/2008 - 11:15).<br /><strong>जया बच्चनने माफी मागितली<br /></strong>आजची सकाळ बातमी घेऊन आली की जया बच्चनने माफी मागितली आहे..... आता हे नेभळट सरकार 'राज ठाकरे' यांच्यावरील बंदी उठवायचे कष्ट घेणार का? माफी जया बच्चन यांनी मागितली आहे , तेव्हा त्यांची चूक त्यांना मान्य आहे. तेव्हा राज ठाकरे योग्य तेच बोलत होते हे सिद्ध झाले आहे. तेव्हा आता बघायचे आपले पोलिस कमिशनर महाशय काय करतात ते.... अर्थात असल्या पक्षपाती कारवायांना 'राज ठाकरे' गणतीत धरत नाही ते वेगेळे...<br />मराठी माणूस पेटला की कोणालाही झुकवू शकतो हे मात्र यातून सिद्ध झाले... आता कालपर्यंत राज ठाकरे की हिटलरशाही म्हणून जोरात स्वतःची पोळी भाजणारे न्यूज चॅनेल्स आता दुसर्या बातम्यांकडे वळतील.... का तर एका हिंदी भाषिकाला माफी मागायला लागली ना....असो...राज ठाकरे यांनी मात्र जयाने सार्वजनिक माफी मागेपर्यंत विरोध कायम ठेवायचे ठरवले आहे. येथे ही बातमी पाहू शकता <a title="http://khabar.josh18.com/news/3117/3" href="http://khabar.josh18.com/news/3117/3">http://khabar.josh18.com/news/3117/3</a><br />जय महाराष्ट्र<br />-सागरUnknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-7140687890099501332008-08-29T08:36:00.000-07:002008-08-29T08:55:09.553-07:00'मनसे' चा दणका...<p><span style="font-size:130%;">राज ठाकरेंनी काल संध्याकाळी आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा सरकारने सुटल्याचा सुस्कारा सोडला असेन. आणि यापुढे पुन्हा त्रास नको म्हणून लगेच महानगरपालिकेला मराठी पाट्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. </span></p><p><span style="font-size:130%;">राज ठाकरेंचा दरारा खरेच एवढा आहे की जवळपास ८०% व्यापार्यांनी मराठी पाट्या तयार करायच्या ऑर्डर्स दिल्या आहेत, हे मी नाही तर पुण्यातले प्रतिष्ठीत दैनिक 'सकाळ' चे शब्द आहेत. या लिंकवर ही बातमी वाचावयास मिळेल. : </span><a href="http://www.esakal.com/esakal/08292008/Specialnews15BDC6FE85.htm"><span style="font-size:130%;">http://www.esakal.com/esakal/08292008/Specialnews15BDC6FE85.htm</span></a><span style="font-size:130%;"><br />खरे तर हे वाचून खूप बरे वाटले. मी इकडे कर्नाटकात गेली चार वर्षे आहे. फक्त इंग्रजीत पाटी इकडे मी देखील पाहीली नाही....पिझ्झा हट , मॅक्डोनाल्ड्स पण कन्नड भाषेत पहावयास मिळते इकडे. ज्या प्रदेशात कोणतेही दुकान वा कंपनी स्वतःचे ऑफीस थाटते तेथील स्थानिक भाषेत त्या संस्थेने वा कंपनीने स्वतःचे नाव लिहावे असा कायदाच आहे मुळी. कायद्याची अंमलबजावणी सरकार करत नाही म्हणून त्याविरुद्ध आवाज उठविला तर राज ठाकरेंनी काय चूक केली?राज ठाकरे जे बोलतात त्याच्या मुळाशी सत्य असते, अभ्यास असतो हे सरकारला माहीत आहे. स्वतःचे नाकर्तेपण मान्य आहे वा मनात आतून कोठेतरी त्यांचे मराठी मन राज ठाकरेंच्या आवाजाला ओ देते म्हणून की काय राज ठाकरेंविरुद्ध नेहमी चौकशी करु , कायदा सर्वांसाठी सारखा आहे अशी गुळमुळीत उत्तरे प्रेसला देतात. आणि हिंदी भाषिक चॅनेल मात्र अवाच्या सव्वा करुन सांगतात हेही तितकेच खरे आहे. राज ठाकरे प्रत्येक भाषणात जय महाराष्ट्र , जय हिंद असे म्हणतात. ते जय हिंद हे देशासाठी असते हे या चॅनेल्सवाल्यांना ऐकू येत नाही का? </span></p><p><span style="font-size:130%;">स्थानीक भूमिपुत्रांना योग्य सन्मान द्यावा ही त्यांनी अपेक्षा केली तर काय चूक केली? इकडे बंगळूरात तुमच्या वा हिंदी भाषेत दादागिरी करुन दाखवा बरे? तेवढी हिम्मत या उत्तर भारतीयांमधे नक्कीच नाहिये. सामावून घेणे , आपलेसे करुन घेणे ही मराठी संस्कृती आहे. पण याचा गैरफायदा घेऊन आपल्यालाच घरातून कोणी बाहेर काढू पहात असेल तर संघर्ष हा केलाच पाहिजे. इतिहास साक्ष आहे, दिल्लीच्या चुकांकरिता फक्त मराठी माणूसच धावून आलेला आहे. मग ते स्वतःचे पानिपत करवून घेऊन का असेना, मराठी माणूस दिलेला शब्द पाळतो. अर्थात भाऊबंदकी पण आपल्यात तेवढीच आहे. त्याचाच हे बाहेरचे फायदा घेतात. पण हे आमच्या लक्षात येत नाही. असो... हा आजचा विषय नाही. आज आनंद साजरा करायचा तो एका तडफदार मराठी नायकाच्या यशाचा....<br />राज ठाकरेंनी बाहेरुन येऊन मुंबई स्वतःची जहागीर असल्याच्या थाटात जे वावरत होते त्यांना धडकी भरविली आहे यात काही संशय नाही.</span></p><p><span style="font-size:130%;">जय महाराष्ट्र !!! जय हिंद !!!</span></p><p><span style="font-size:130%;">- सागर</span></p>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-1052122467325602622008-08-27T05:36:00.000-07:002008-08-27T05:40:01.828-07:00कोसीचे अश्रू<span style="font-size:130%;">कालच मी सगळ्या न्यूज चॅनल वर एकच बातमी सविस्तर पणे पहात होतो.बिहार मध्ये कोसी नदीने कहर केला त्याची बातमी होती ती. </span><br /><span style="font-size:130%;"><br />न्यूज चॅनल सगळे एकजात प्रसिद्धीसाठी एकाच बातमीचा मोठा प्रपोगंडा करुन खूप मारा करतात हे खरे आहे.पण जे काल मी पाहीले त्यात विदारकताही तितकीच होती.<br /><br /><p><span class=""></span> </p><p>मनापासून सांगतो, मी राज ठाकरे यांचा भक्त आहे. मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, मराठी संस्कृतीसाठी, एवढ्या पोटतिडकीने भांडणारा एकही माणूस मी पाहीला नाही. अवघा महाराष्ट्र राज ठाकरे यांच्या मागे उभा राहिला पाहिजे. मी अधून मधून कधीतरी मुंबईला जातो तेव्हा लोकल मधून प्रवास करणारे यूपी-बिहारी मराठी मुलींना शिट्ट्या मारुन छेडतात तेव्हा रक्तच सळसळते. राज ठाकरे यांचा सध्याचा जो मोठा आक्षेप आहे तो सर्व उत्तर भारतीयांना नव्हे तर "गुंडगिरी" करणार्या उत्तर भारतीयांकरिता आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. आपल्या मुली घरातून बाहेर गेल्या की तितक्याच सुरक्षितपणे परत यायला हव्यात हे फक्त मराठी आई-बापांनाच नव्हे तर उत्तर भारतीय आई-बापांकरीता देखील लागू आहे....पण मी बोलत होतो ते बिहारमध्ये कोसी नदीने ढाळलेल्या अश्रूंबद्दल. </p><p><br />न्यूज चॅनल्स गाजावाजा करतात हे खरे आहे. पण त्यामुळेच सत्य सर्वसामान्यांपर्यंत तरी पोहोचते...तिकडे दिल्लीत लालू प्रसाद सांगताहेत की बिहार सरकार काहीच करत नाही. खरे आहे त्यांचे.पण लालूप्रसाद जरी सत्तेवर असते तरी त्यांनी नितिशकुमारांनी जे केले त्यापेक्षा काही वेगळे केले नसते. नदीने १२० किलोमीटरने पात्र बदलले तर त्याला लालूप्रसाद-नितिशकुमार काय करतील </p><p><br />हा आजपर्यंतचा इतिहास आहे की निसर्गाच्या शक्तीपुढे मानवाची शक्ती कायम तोकडी पडली आहे.निसर्गावर आक्रमण केले की त्याचा फटका आपल्याला कधीना कधी बसणारच. तिकडे नेपाळमधे धरण भंगले तर पूर येईन नाहीतर काय होईन? अशा आपत्ती नियोजनाकरिता केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांकडे आपत्ती हाताळण्यासाठी विशेष दले असली पाहिजेत. सामग्री असली पाहिजेत.मी 'वोल्कॅनो' हा एक इंग्रजी चित्रपट पाहिला होता. त्यात अशा प्रकारच्या आपत्ती हाताळण्यासाठी एक विशेष दल असलेले दाखवले आहे. आपल्याकडे अशी आपत्ती आली की सैनिकी सहाय्यता घेतली जाते. मुळात अशी दलेच अस्त्तित्त्वात नाहीत तर सैन्यावर हा ताण पडणारच. सैन्याची कार्यक्षमता लढाई व तत्सम कारणांकरिताच वापरायला हवी.आर्य चाणक्यांनी देखील कौटीलीय अर्थशास्त्रात सैन्याची कामे नेमून दिलेली आहेत. ते जरी आज तंतोतंत पाळले तरी अशा आपत्तींना आपण तोंड देऊ शकू... </p><p>मुळात एकसंध भारत होणे गरजेचे आहे. आपण सगळे आपापसात भांडत बसतो. राष्ट्रीय हित कोणीही लक्षात घेत नाही.लोकांच्या आपत्तींवर नेतेलोक दिल्लीत बसून आपल्या पोळ्या भाजतात. </p><p>पण २० लाख लोक बेघर झाले, ३० हजारावर लोकांचा पत्ता नाही. अरे एक माणुसकी म्हणून तरी कोणी या घटनेकडे पहावे.... भूकंप झाला , सुनामी आली की लगेच मोठ्या देणग्या गोळा होतात.कोसीचे अश्रू पुसताना मला तरी कोणी दिसत नाही...आता पूर ओसरला तर महामारीचा मोठा धोका आहे. अशा वे़ळी औषधे, अन्न, वस्त्र, निवारा यासाठी सर्सामान्य माणूस केवळ झगडतानाच दिसणार आहे.आपापसातील हेवेदावे अशा वेळी सर्वांनीच बाजूला ठेवावे असे मला वाटते.<span class=""></span></p><p>माणुसकी पेक्षा जगात कोणतीही गोष्ट मोठी नाही....<br />देव कोसीचे अश्रू पुसण्यासाठी सर्वांना मदत करण्याची सद्बुद्धी देवो..... </p><p><br />- सागर </p></span>Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-890717524066145929.post-16788924633764682462008-08-15T21:43:00.000-07:002008-08-22T06:34:58.306-07:00"सोनेरी पहाट" जन्माला आली आहे.<span style="font-size:130%;color:#ff6600;">"सोनेरी पहाट" हे एक चिंतन आहे. एक यज्ञ आहे, लोकांच्या साखरझोपेचा भ्रम मोडण्याचा<br />मला माहीत नाही माझ्या या ब्लॉग मुळे किती लोक जागृत होतील. किंबहुना माझे असे मत आहे की आजचा समाज हा जागृतच आहे.<br />पण नक्की काय केले पाहिजे हे त्याला कळत नाही. आपण सर्वसामान्य माणसे घडणार्या घटना फक्त बघत बसतो. प्रत्यक्ष घटनेचा भागीदार होण्यापेक्षा आपण साक्षीदार होणे जास्त पसंत करतो.<br />या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हा सर्व वाचकांना काही कृती करण्याजोग्या गोष्टी तर सुचवेनच , पण तत्कालीन राजनीती कोणत्या दिशेने चालली आहे आणि आपले सर्वसामान्यांचे त्यात कोणते स्थान असले पाहिजे यावर प्रकाशझोत टाकणार आहे. यात लिहीत असलेल्या गोष्टी मला स्वत:वरही लागू होतील. येथील माझे लेखन हे एक व्यक्ती म्हणून केलेले नसून समाजाच्या दृष्टीकोनातून केलेले असेन.<br />तेव्हा भेट देत रहा आणि ही "सोनेरी पहाट" केवळ माझी एकट्याचीच नाही तर ती त्तुम्हा-आम्हा सर्वांचीच सोनेरी पहाट आहे.<br />प्रत्येक मनुष्याने - अगदी सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत - आपले आयुष्य निर्भय , सुखात, आणि आनंदाने जगावे या मताचा मी आहे.<br />जीवनावर मी खूप प्रेम करतो, जे मी पाहीले, भोगले, जाणवले त्यातून "सोनेरी पहाट" जन्माला आली आहे.<br />ही सोनेरी पहाट सर्वांच्या आयुष्यात आनंद देणारी होवो हीच सर्वव्यापी निसर्गशक्तीकडे प्रार्थना..... </span>Unknownnoreply@blogger.com0