Saturday, June 11, 2011

एकी नसल्यामुळे सरकारचे फावते आहे


लोकांमध्ये सरकारच्या मनमानी कारभाराबद्दल प्रचंड प्रक्षोभ आहे.
पण सर्व जनआंदोलकांमध्ये एकी नसल्यामुळे सरकारचे फावते आहे.

फोडा आणि झोडा हीच इंग्रजांची नीती काँग्रेस आजपर्यंत वापरत आले आहे.
म्हणूनच सामान्य जनता अण्णा हजारे, रामदेवबाबा व तत्सम इतर लोकनेत्यांमागे जरी जात असली तरी त्यात चार दिवसांची जत्रा होते एवढेच
सरकार मात्र मूग गिळून हा तमाशा बघत बसले आहे.
एकाच व्यासपीठावर अण्णा हजारे, रामदेव बाबा , श्री श्री रविशंकरजी, सर्व धर्मीय संत-इमाम-फादर एकत्र आले तर सरकारची काय हिम्मत आहे की विरोधाने अशी आंदोलने चिरडून टाकण्याची?

सामान्य जनता आज गांधीजींची ३ माकडे झाली आहेत.

एकी हेच बळ हा पुस्तकी सुविचार सर्वसामान्य जनता आचरणात आणेन तो दिवस भारताच्या उज्ज्वल भवितव्याचा आहे.

आजपर्यंत जनतेने नुसत्या पुढच्या अफरातफरीवर नजर टाकली असती तरी हे सरकार पडावे यासाठी ठोस भूमिका घेऊन आंदोलने केली असती.
मतदान करुन ५ वर्षांसाठी सरकार निवडण्याचा हक्क जसा सामान्य जनतेला आहे
तसाच हक्क जर ते सरकार कार्यक्षमतेने काम करत नसेन तर  ५ वर्षे पूर्ण होण्याअगोदर खाली खेचण्याचा हक्कही सामान्य जनतेला आहेच.
या हक्काची अंमलबजावणी कोण करते आज?

विकास होत नसेन तर आपल्या कार्यक्षेत्रातील आमदार - खासदाराला जाब विचारण्याचा अधिकार घटनेने सर्वसामान्य जनतेला दिला आहे.
तो हक्क कार्यक्षमतेने वापरण्याऐवजी आपण या नेत्यांच्या दहशतीखाली दबून जातो.

नाहीतर
बोफोर्स कांड
विमान खरेदी कांड
कॉमनवेल्थ घोटाला
हवाला घोटाळा
२जी स्पेक्ट्रम घोटाळा
राडिया कांड
आयपीएल कांड

इत्यादी ... इत्यादी ...

अशी भ्रष्टाचाराची वाढती कमान असलेल्या नेत्यांना आपण पुन्हा पुन्हा निवडून देता?

विरोधी पार्टी पण तशीच आहे असे म्हणून आपण भ्रष्ट नेत्यांनाच पुन्हा निवडून देतो. त्यामुळे स्वतःचाच पैसा लुटला जातोय ही जाणीवच जनतेला नाहिये.
५०० रुपयाच्या बिलापैकी
३९० रुपये जेवणाचे असतात आणि ११० रुपये आपण सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅट पोटी देतो हे कोणीतरी बघते का?

२०-२५ रुपये किलोने मिळणारा तांदूळ (जे गरिबांचे प्रमुख अन्न आहे) तो आज ६० - ७० रुपये किलोने मिळतो आहे.  ( चांगला बासमती १०० च्या पुढे मिळतो)

पेट्रोलचे भाव कित्येक वेळा वाढवले.  ३८- ४० रुपयांनी मिळणारे पेट्रोल आज  ७० रुपयांच्या च्या पुढे गेले आहे

एकत्र व्हा. तरच लोकशाहीचा फायदा सामान्य जनतेला मिळेन. नाहीतर नेतेपणाचा बुरखा पांघरलेले लुटारु तुमच्या कष्टाचा पैसा लुटल्याशिवाय राहणार नाहीत.