Thursday, August 20, 2009

जसवंतसिंहाना भाजपाने बरखास्त का केले?

जसवंतसिंहाना भाजपाने बरखास्त का केले? हा मोठा प्रश्न असेन भाजपात काम केलेल्या सर्वांसाठी आणि भाजपा समर्थक सर्वच मतदारांच्या मनात.

पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी भाजपा आणि जसवंतसिंह यांच्या मित्रवर्यांमध्ये हे पुस्तक अगोदरच वितरित झालेले होते. तसे बहुतेक सर्व पुस्तकांच्या बाबतीत होत असते ....अभिप्रायासाठी... आडवाणी हे देखील पट्टीचे वाचक असल्यामुळे त्यांनी पुस्तक वाचले असेनच आणि त्यांची जसवंतसिंहांना बरखास्त करण्या मागे निर्णायक भूमिका असल्याचे तर्क हिंदी पत्रकार व्यक्त करत आहेत. (मी बंगळूरात राजस्थान पत्रिका वाचतो. त्यात आजच्याच अंकात यावर लेख आला आहे.)

खरेखोटे देवच जाणे..

पण जसवंतसिंहांच्या पुस्तकामुळे 'जीनांमुळे' पाकीस्तानची निर्मिती झाली हे सत्य खोटे ठरु शकत नाही. भारताच्या फाळणीचा सखोल अभ्यास करुन विदेशी लेखकांनी लिहिलेल्या सुप्रसिद्ध 'फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट' या पुस्तकातही हेच सांगितले गेले आहे. या पुस्तकावर तर पाकीस्तानात बंदी आहे. त्यात जीनांविषयी अनेक सत्य बाबी लिहिलेल्या आहेत. जीज्ञासूंनी हे पुस्तक अवश्य वाचावे.

माझे स्वत:चे मत विचाराल तर गांधीजींच्या अहिंसेमुळे आपल्या भारत देशाची जेवढी हिंसा झाली आहे तेवढी जगाच्या इतिहासात कोठेही झालेली नाही. हिंसक अन्यायाविरुद्ध हिंसक प्रतिकार हेच एकमेव शस्त्र ठरते. जगाच्या इतिहासात डोकावून पाहिले तर सगळीकडे एकच चित्र दिसते की हिंसक अत्याचाराला हिंसेनेच प्रत्युत्तर दिले तरच अन्यायाविरुद्ध जिंकता येते. ग्यारिबाल्डीने काय केले? ... जोसेफ़ मॆझिनि ने काय केले? .... स्वातंत्र्याचा लढा हिंसेनेच लढले ना?
हिटलर... नेपोलियन या हुकुमशहांना सत्ता कशी मिळाली? हिंसेच्या माध्यमातूनच ना? ... हिटलर ला नेस्तनाबूत कसे केले गेले? ... युद्धानेच ना?...

जो पर्यंत समस्त भारतवासी गांधीजींच्या किडलेल्या आणि सडलेल्या तत्त्वांना घट्ट जळवासारखे पकडून बसलेल्या कॊंग्रेसचे आंधळे अनुकरण करतील तर येत्या काही दशकांत भारत या नावाचा देश आणि हिंदू नावाचा महान धर्म नष्ट झालेला असेन.
जाज्ज्वल्य देशभक्ती जागवण्यासाठी प्रखर भूमिका घेणे खूप आवश्यक आहे समस्त भारतवासियांनो.... एकदाच किंमत मोजावी लागेल पण आपल्या पुढच्या १००० पिढ्या सुखाने जगतील... तेव्हा नष्ट होऊन इतिहासाचे जीर्ण पान व्हायचे का इतिहास हादरवून सोडायचा ते तुमचे तुम्ही ठरवा.. जय हिंद

विषयांतर होतंय... मुद्याकडे परत वळतो... तर जसवंतसिंहांना मिळालेली शि़क्षा ही योग्य आहे असे माझे मत आहे.
अशा सडक्या मनोवृत्तींना त्यांची जागा दाखवून देणे खूप आवश्यक आहे. भाजपाने जसवंतसिंहांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली आहे.

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
(पूर्वीच्याच अखंड भारताचे स्वप्न पाहणारा) सागर